शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय खलबतं सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 14:49 IST

एकीकडे काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील एक घटकपक्षही नाराज असल्याचं समोर येत आहे.

ठळक मुद्दे सरकार या घटक पक्षांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या पक्षांची पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बैठक सुरूमहाविकास आघाडी सरकारला या घटक पक्षांच्या आमदारांचा पाठिंबाघटकपक्षांच्या ८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही एकत्र लढण्याची भूमिका घेतली. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद आणखीच वाढला.

एकीकडे काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील एक घटकपक्षही नाराज असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारला या घटक पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याने सरकारनं विधानसभेत मजबूत बहुमत सिद्ध केले होते. परंतु सरकार या घटक पक्षांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या पक्षांची पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बैठक सुरू केली आहे. शेकापच्या प्रदेश कार्यालयात या पक्षांची बैठक सुरू आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो तरी सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप या पक्षांनी केला आहे. घटकपक्षांच्या ८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र आम्हाला वारंवार डावलण्यात येत आहे अशी भावना घटकपक्षांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळेच यापुढे काय रणनीती करायची? हे ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते.

बैठकीत कोण कोण सहभागी?

शेकापचे आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि इतर डाव्या पक्षांचे नेते उपस्थित आहेत. महाविकास आघाडीनं लक्ष न दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर घटक पक्ष एकत्रित लढणार असल्याचं सांगितले जात आहे. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमधील विसंवाद आणि आता त्यात घटक पक्षांची नाराजी यामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. हे सरकार त्यांच्या भांडणामुळेच पडणार आहे असं वारंवार विरोधी पक्ष भाजपाकडून सांगितले जात आहे. मात्र सरकारमधील अनेक नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या घटकपक्षांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) दूर करणार का? हे पाहणं गरजेचे आहे.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAbu Azmiअबू आझमीRaju Shettyराजू शेट्टी