शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जनतेला मोदी यांच्या 'बोगस अच्च्छे दिन' ला पर्याय हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 12:47 IST

भारतीय घटनेवर तिरस्कार, दुही आणि हिंसा पसरविणाऱ्या शक्तींनी आक्रमण केले आहे. दुहीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असेही राहुल यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : भारतीय घटनेवर तिरस्कार, दुही आणि हिंसा पसरविणाऱ्या शक्तींनी आक्रमण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बोगस अच्छे दिन'च्या सरकारला जनता पर्याय शोधत असून काँग्रेसला ही संधी साधायची आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हटविण्यासाठी देशातील जनता काँग्रेस आणि आघाडीमधील पक्षांकडे आशेने पाहत आहे. लोकांना उद्भवत असलेल्या समस्या एेकणारे आणि त्यावरील उपायांद्वारे गरीबी, बेरोजगारी आणि असमानता कमी करणारे सरकार त्यांना हवे आहे. चांगले जगण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी शेतकरी व युवकांना काँग्रेसच पर्याय दिसत आहे. दुहीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असेही राहुल यांनी सांगितले. मोदी यांचे सरकार भ्रष्टाचार, आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. ते देश चालिवण्यास असमर्थ आहेत. या सरकारला हटविण्यासाठी व जनतेला हवे असलेले सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील, असे राहुल गांधी म्हणाले. भाजप आणि आरएसएस जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून देशाची शक्तीस्थाने असलेल्या संस्थांवर हल्ले करण्यात आले आहेत. आधुनिक भारतामध्ये या संस्थांना लोकशाहीची मंदिरे म्हणून ओळखले जाते. या शक्ती ती उद्धवस्त करत सुटली असल्याचा आरोप राहुल यांनी केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी