शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

जनतेला मोदी यांच्या 'बोगस अच्च्छे दिन' ला पर्याय हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 12:47 IST

भारतीय घटनेवर तिरस्कार, दुही आणि हिंसा पसरविणाऱ्या शक्तींनी आक्रमण केले आहे. दुहीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असेही राहुल यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : भारतीय घटनेवर तिरस्कार, दुही आणि हिंसा पसरविणाऱ्या शक्तींनी आक्रमण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बोगस अच्छे दिन'च्या सरकारला जनता पर्याय शोधत असून काँग्रेसला ही संधी साधायची आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हटविण्यासाठी देशातील जनता काँग्रेस आणि आघाडीमधील पक्षांकडे आशेने पाहत आहे. लोकांना उद्भवत असलेल्या समस्या एेकणारे आणि त्यावरील उपायांद्वारे गरीबी, बेरोजगारी आणि असमानता कमी करणारे सरकार त्यांना हवे आहे. चांगले जगण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी शेतकरी व युवकांना काँग्रेसच पर्याय दिसत आहे. दुहीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असेही राहुल यांनी सांगितले. मोदी यांचे सरकार भ्रष्टाचार, आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. ते देश चालिवण्यास असमर्थ आहेत. या सरकारला हटविण्यासाठी व जनतेला हवे असलेले सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील, असे राहुल गांधी म्हणाले. भाजप आणि आरएसएस जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून देशाची शक्तीस्थाने असलेल्या संस्थांवर हल्ले करण्यात आले आहेत. आधुनिक भारतामध्ये या संस्थांना लोकशाहीची मंदिरे म्हणून ओळखले जाते. या शक्ती ती उद्धवस्त करत सुटली असल्याचा आरोप राहुल यांनी केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी