शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

“शिवरायांच्या नावानं राजकारण जरूर करा, पण महाराजांचा ‘हा’ आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरज”

By प्रविण मरगळे | Updated: October 22, 2020 11:22 IST

MP Sambhajiraje News: सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहचवावी अशी मागणी खासदार संभाजीराजेंनी केली आहे.

ठळक मुद्देकष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलगाडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे घ्याशिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा, पण आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरजकेंद्र व राज्य शासनाने एकमेकांकडे बोट न दाखविता सामुहिक जबाबदारी घेत संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक -संभाजीराजे

मुंबई  - परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट उभं राहिलंय, अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे काढत आहेत, मात्र या दौऱ्यात दोघंही एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यातही व्यस्त आहे. विरोधी पक्षाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. परंतु सरकारने ठोस मदत देण्याची घोषणा अद्यापही केली नाही.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरु असलेल्या राजकीय संघर्षावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी एका पोस्टमधून सर्वच नेत्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असं म्हटलं आहे. संभाजीराजेंनी पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशाचा दाखलाही दिला आहे. संभाजीराजे म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहचवावी. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा, पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या या आदेशात म्हटलंय की, कष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलगाडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे घ्या, खंडी, दोन खंडी धान्य द्या, दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करू नका, मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल अशा शब्दात शेतकऱ्यांना मदत करण्याचा आदेश छत्रपतींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान खासदार संभाजीराजेंनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली होती. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य शासनाने एकमेकांकडे बोट न दाखविता सामुहिक जबाबदारी घेत संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहे. तर उभी पिके आणि माती सुद्धा वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. राज्य सरकारने प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी. यासोबतच तेलंगणा राज्याच्या धर्तीवर काही रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळेल असे पाहावे. मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करुन आलेल्या छ. संभाजीराजे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला होता.

तसेच कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी शेतकरी जगला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कर्ज घ्यावे लागले तरी हरकत नाही. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार करायला हवा. ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक पाहणीला येऊ शकत नाही. त्यामुळे राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा. रब्बीसाठी बँकासुद्धा आता कर्ज देणार नाहीत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला तर कर्ज मिळू शकेल असंही संभाजीराजे म्हणाले होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFarmerशेतकरीRainपाऊसSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार