शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

MP Crisis: काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपाच्या संपर्कात; पोटनिवडणुकीनंतर सोडणार साथ

By प्रविण मरगळे | Updated: October 28, 2020 09:28 IST

Madhya Pradesh, Congress, BJP Mla News: पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

ठळक मुद्देपोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधी कॉंग्रेसला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे काय?आमदारांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. इतर अनेक आमदार संपर्कातजर भाजपला अशा पद्धतीने आमदारांना विकत घ्यायचे असेल तर पोटनिवडणुका का घेत आहेत? - काँग्रेस

भोपाळ -  मध्य प्रदेशच्या राजकारणात गेल्या ७ महिन्यांत अनेक काँग्रेसआमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपाची वाट धरली. आतापर्यंत २६ आमदारांनीकाँग्रेसचा हात सोडून भाजपाला साथ दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात काँग्रेसचं सरकार कोसळलं आणि भाजपाला सत्तास्थापन करण्यात यश आलं. आता आणखी काही आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाने केला आहे.

पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पोटनिवडणुकीदरम्यान कॉंग्रेसचे आणखी एक आमदार भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर अजून काही आमदार संपर्कात आहेत, असा भाजपा नेत्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधी कॉंग्रेसला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

भाजपा नेते पंकज चतुर्वेदी म्हणाले की, भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांचे स्वागत आहे. आमदारांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. इतर अनेक कॉंग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. विधानसभेच्या २७ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदारांचा पाठिंबा व राजीनामा बंद होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता, परंतु अद्याप ते सुरूच आहे. पहिल्यांदा भगवानपुरा येथील अपक्ष आमदार केदार चिदाभाई डावार यांनी शिवराज सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि आता कॉंग्रेसचे आमदार राहुलसिंग लोधी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस सतत भाजपावर घोडेबाजाराचा आरोप करत आहे. जर भाजपला अशा पद्धतीने आमदारांना विकत घ्यायचे असेल तर पोटनिवडणुका का घेत आहेत असा सवाल कॉंग्रेस नेते जेपी धनोपिया यांनी केला आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सभागृहाचे सदस्यत्व नसतानाही मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे सहा महिने पूर्ण झाल्याने या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारून ते राज्यपालांकडे पाठवले आहेत. तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झाले होते. तसेच ते पोटनिवडणुकही लढवत आहेत.

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २२ समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्याने मार्च महिन्यात कमलनाथ सरकार कोसळले होते. तर भाजपाच्या दोन आमदारांचं निधन झाल्याने दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तर अजून तीन आमदारांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारला होते. त्यामुळे रिक्त झालेल्या एकूण २७ मतदारसंघांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसMLAआमदारElectionनिवडणूक