शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

MP Crisis: काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपाच्या संपर्कात; पोटनिवडणुकीनंतर सोडणार साथ

By प्रविण मरगळे | Updated: October 28, 2020 09:28 IST

Madhya Pradesh, Congress, BJP Mla News: पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

ठळक मुद्देपोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधी कॉंग्रेसला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे काय?आमदारांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. इतर अनेक आमदार संपर्कातजर भाजपला अशा पद्धतीने आमदारांना विकत घ्यायचे असेल तर पोटनिवडणुका का घेत आहेत? - काँग्रेस

भोपाळ -  मध्य प्रदेशच्या राजकारणात गेल्या ७ महिन्यांत अनेक काँग्रेसआमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपाची वाट धरली. आतापर्यंत २६ आमदारांनीकाँग्रेसचा हात सोडून भाजपाला साथ दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात काँग्रेसचं सरकार कोसळलं आणि भाजपाला सत्तास्थापन करण्यात यश आलं. आता आणखी काही आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाने केला आहे.

पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पोटनिवडणुकीदरम्यान कॉंग्रेसचे आणखी एक आमदार भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर अजून काही आमदार संपर्कात आहेत, असा भाजपा नेत्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधी कॉंग्रेसला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

भाजपा नेते पंकज चतुर्वेदी म्हणाले की, भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांचे स्वागत आहे. आमदारांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. इतर अनेक कॉंग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. विधानसभेच्या २७ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदारांचा पाठिंबा व राजीनामा बंद होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता, परंतु अद्याप ते सुरूच आहे. पहिल्यांदा भगवानपुरा येथील अपक्ष आमदार केदार चिदाभाई डावार यांनी शिवराज सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि आता कॉंग्रेसचे आमदार राहुलसिंग लोधी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस सतत भाजपावर घोडेबाजाराचा आरोप करत आहे. जर भाजपला अशा पद्धतीने आमदारांना विकत घ्यायचे असेल तर पोटनिवडणुका का घेत आहेत असा सवाल कॉंग्रेस नेते जेपी धनोपिया यांनी केला आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सभागृहाचे सदस्यत्व नसतानाही मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे सहा महिने पूर्ण झाल्याने या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारून ते राज्यपालांकडे पाठवले आहेत. तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झाले होते. तसेच ते पोटनिवडणुकही लढवत आहेत.

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २२ समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्याने मार्च महिन्यात कमलनाथ सरकार कोसळले होते. तर भाजपाच्या दोन आमदारांचं निधन झाल्याने दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तर अजून तीन आमदारांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारला होते. त्यामुळे रिक्त झालेल्या एकूण २७ मतदारसंघांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसMLAआमदारElectionनिवडणूक