शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदींचे राज्य म्हणजे आणीबाणीच्या पुढची परिस्थिती - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:15 IST

वाढती बेरोजगारी, महागाई याबाबत मोदी आवाक्षरही बोलत नाहीत. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून ते मते मागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबई : पुलवामा हल्ल्याशी संबंधित किंवा गेल्या पाच वर्षांत आणलेल्या योजनांसंदर्भात नेमक्या बातम्या, आकडेवारी जनतेसमोर येऊ द्यायची नाही. अशा घटना आणि योजनांच्या माध्यमातून स्वत:ला पोषक वातावरण निर्माण करायचे, असा धंदा भाजपने सुरू केला आहे. ही आणीबाणीच्या पुढची परिस्थिती आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.भांडुप येथे बुधवारी मनसेची सभा झाली. या वेळी त्यांनी मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा यांना खोटे बोलण्याचा रोग जडलाय, अशी बोचरी टीकाही केली. नोटाबंदी, जीएसटी ही फसलेली धोरणे आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई याबाबत मोदी आवाक्षरही बोलत नाहीत. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून ते मते मागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.साध्वी प्रज्ञा सिंह हिला तिकिट देऊन भाजपवाले तिच्या कृत्याचे समर्थनच करीत आहेत. त्या बाईला सिग्नल तोडला म्हणून अटक केली नव्हती, तर ती बॉम्बस्फोटाची केस होती. दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. मरणारी माणसे कोणत्या धर्माची आहेत, हे बॉम्बला माहीत नसते. त्यामुळे दहशतवाद्यांना पाठीशी घालू नका, असेही राज म्हणाले.मोनिका मोरेही स्टेजवररेल्वे अपघातात दोन्ही हात गामवलेल्या मोनिका मोरे हिला देखील स्टेजवर आणण्यात आले. तिला कुठलीही राजकीय मदत न करता केवळ जाहिरात करण्यात आल्याचे सांगत राज यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निषाणा साधला. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे, अशी बोंब इथले खासदार किरीट सौमय्या यांनी २०१४ पूर्वी ठोकली होती. २०१४ नंतर मोदी सरकार सत्तेत आल्यावर सौमय्या गप्प का? असा सवाल राज यांनी सभेतून उपस्थित केला.‘पंतप्रधानांच्या गावी शौचालयच नाही’मोदी यांच्या विविध योजनांचा व्हिडिओतून पोलखोल करत राज यांनी मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांसह त्यांच्या स्वत:च्या गावाची दुर्दशा दाखवली. मोदींच्याच गावात महिलांना उघड्यावर बसावे लागत आहे. त्यांच्या गावात शौचालयेच नाहीत. हा माणूस जिथून आला त्या गावाची परिस्थिती अशी असेल, तर तो देश का बदलेल? अशी टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला