शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी'; मनसेचा घणाघात

By मोरेश्वर येरम | Updated: November 23, 2020 10:36 IST

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या राज्य सरकारच्या उपक्रमाचा धागा पकडून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या भाषणावर मनसेचा घणाघातमनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत घेतला समाचारमुख्यमंत्र्यांच्या भाषणाने नेहमीप्रमाणे अपेक्षाभंग झाल्याची टीका

मुंबईराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात रविवारी जनतेला फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संबोधित केलं. मुख्यमंत्र्याच्या या भाषणावर मनसेने जोरदार टीका केली आहे. 

'मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी', असं ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या संबोधनात कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी आणि पोस्ट कोविडच्या परिणाम यांसह विविध विषयांवर आपलं मत मांडलं. याशिवाय, कोरोना काळ अजून संपलेला नाही याची जाणीव करुन देत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या राज्य सरकारच्या उपक्रमाचीही आठवण करुन दिली. हाच धागा पकडून संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. 

आपला मुख्यमंत्री आपले दुर्दैव असून ती आता आपलीच जबाबदारी असल्याचं सांगत देशपांडे यांनी घणाघात केला आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मनेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. पण अजूनही वाढीव वीजबिलाचा मुद्दा ऐरणीवर आहे, असंही काल संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं होतं. 'कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण काही लोकांचं हे उघडा ते उघडा असं सुरू आहे. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. राज्य सरकार म्हणून जेवढी जबाबदारी माझ्यावर आहे. तेवढी जबाबदारी हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. 

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेना