शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Farmer Protest: कुत्रा मेला तरी शोक, पण 250 मृत आंदोलक शेतकऱ्यांचे काय?; राज्यपाल सत्यपाल मलिकांची उघड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 14:19 IST

Farmer Protest: शेतकरी आंदोलनाचा एमएसपी हा मुख्य मुद्दा आहे. जर एमएसपीलाच कायदेशीकर केले तर आरामात हा प्रश्न सुटेल. सत्यपाल मलिक नाराजी व्यक्त करून एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ब्रिटिशांच्या सरकारचे उदाहरण दिले.

झुंझुनूं : एकीकडे शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) बाजुने विरोधकांसह कोणीही बोलायला तयार नाहीय. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघत नाहीय. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बसले आहेत. यावर मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik ) यांनी मोठे विधान केले आहे. झुंझुनूंच्या एका खासगी कार्यक्रमामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या वागणुकीविरोधात उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. (Meghalaya Governor Satyapal Malik angry on Central government silent on Farmers Death in Potest. )

पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, शेतकरी आंदोलन एवढा दीर्घ काळ सुरु राहणे कोणाच्याच हिताचे नाहीय. कुत्रा मेला तरी आमच्या नेत्यांचा शोक संदेश येतो. मात्र, 250 शेतकरी या आंदोलनात मृत झाले त्यांच्याबाबत कोणी चकार शब्द काढत नाही. माझ्या आत्म्याला हीच गोष्ट दु:ख देतेय. तोडगा निघणारच नाही असे हे प्रकरण नक्कीच नाहीय, हे आंदोलन संपू शकते, अशा शब्दांत सत्यपाल मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

एमएसपी हा मुख्य मुद्दा आहे. जर एमएसपीलाच कायदेशीकर केले तर आरामात हा प्रश्न सुटेल. देशभरातील शेतकऱ्यांमध्ये हा मुद्दा बनला आहे. अशावेळी तो लवकर सोडविणे हिताचे आहे. मी घटनात्मक पदावर बसलोय. दलालाचे काम करू शकत नाही. मी फक्त शेतकरी नेते आणि सरकारच्या लोकांना सल्ला देऊ शकतो, माझे केवळ एवढेच काम आहे, असेही त्यांना सांगितले. 

मलिक नाराजी व्यक्त करून एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ब्रिटिशांच्या सरकारचे उदाहरण दिले. शेतमालाला योग्य भाव न मिळण्याचा मुद्दा आजचा नाहीय. ब्रिटिशांच्या काळात मंत्री राहिलेल्या छोटूराम आणि व्हाईसरॉय यांच्यातील एक किस्सादेखील सांगितला. दुसऱ्या महायुद्धावेळी व्हाईसरॉय मंत्री छोटूरामना भेटायला गेले आणि त्यांनी अन्नधान्याची मागणी केली. तेव्हा छोटूराम यांनी त्यांना मी तुम्हाला अन्नधान्य कितीला द्यायचे याचा दर ठरविणार असल्याचे सांगितले. यावर व्हाईसरॉय यांनी सैन्याला पाठवून शेतकऱ्यांकडून धान्य घेईन अशी धमकी छोटूरामना दिली. यावर छोटूराम यांनी व्हाईसरॉयना कड्या शब्दांत उत्तर दिले. ''एकवेळ धान्याला आग लावा, परंतू तुम्हाला कमी किंमतीत गहू देऊ नका, असे मी शेतकऱ्यांना सांगेन'' अशा शब्दांत सुनावत कमी किंमतीत धान्य देण्यास नकार दिला होता. 

केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी...

शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. त्या देशाला वाचवले जाऊ शकत नाही. त्यामुळे लष्कर आणि शेतकरी समाधानी ठेवले गेले पाहिजेत, असे सांगून मलिक यांनी शेतकऱ्यांना दुखवू नका’, असे  दोन दिवसांपूर्वीच  मोदी आणि शहा यांना मलिक यांनी आवाहन केले होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार