शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“खोटारड्या तालिका अध्यक्षांचा धिक्कार; लोकशाहीच्या मंदिरात विरोधकांची मुस्कटदाबी केली जातेय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 11:50 IST

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: अधिवेशन २ किंवा ३ आठवड्यांचे घ्यावं असं सातत्याने मागणी करतो परंतु कोरोनाच्या नावाखाली सरकार चर्चेतून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही.

ठळक मुद्दे लोकशाहीच्या मंदिरात विरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी करण्याचं काम सरकार करतंय. कवडीमोल किंमतीने शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे. सरकारकडून कुठलीही मदत होत नाही.आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मराठा आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले.

मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळात सोमवारी विधानसभेतील भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबन करण्यात आले. या आमदारांच्या निलंबनानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे, नागपूर याठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याचसोबत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा आमदारांनी विधिमंडळ पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली होती. यावेळी ठाकरे सरकारच्या धिक्काराचा निषेध करणारा ठराव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मांडला.

या ठरावावर बोलताना भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrisha vikhe Patil) म्हणाले की, ज्या पद्धतीने सदस्यांच्या निलंबनाचा घाट या सरकारने घातला. नियमबाह्य कृती करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम या सरकारने केलं आहे. या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो. नसलेल्या गोष्टी तालिका अध्यक्षांनी सांगायला सुरुवात केली. खोटं बोल पण रेटून बोल अशारितीने त्यांनी राज्याच्या जनतेची दिशाभूल केली. अशा खोटारड्या तालिका अध्यक्षांचा धिक्कार करतो असं त्यांनी सांगितले.

तसेच अधिवेशन २ किंवा ३ आठवड्यांचे घ्यावं असं सातत्याने मागणी करतो परंतु कोरोनाच्या नावाखाली सरकार चर्चेतून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. लोकशाहीच्या मंदिरात विरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी करण्याचं काम सरकार करतंय. वंचित घटकांच्या प्रश्नावर चर्चा होणं गरजेचे आहे. शेतकरी हवालदिल झालाय. पिकविमा  कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होतेय. मार्केट बंद केलेत. कवडीमोल किंमतीने शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे. सरकारकडून कुठलीही मदत होत नाही. मग हे सगळे प्रश्न सभागृहात मांडायचे नाही तर कुठे मांडणार असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मराठा आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले. सर्वोच्च न्यायालयात सरकार कमी पडले. केंद्राकडे बोट दाखवून स्वत:चं अपयश लपवण्याचं काम सरकार करतंय. शेतकरी वाऱ्यावर आहे. आरक्षण नाकारल्यामुळे ओबीसी, मराठा समाज नाराज आहे. कोरोना महामारीत लाखो तरूणांचा रोजगार गेला. अनेक व्यापरांचे आर्थिक नुकसान झाले. सभागृहात अतिशय खोटारडेपणाने सरकारचं अपयश लपवण्याचा प्रयत्न केला गेला. आपली अकार्यक्षमता लपवायची. शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत नाही, आरक्षण राखण्यासाठी कार्यक्रम नाही. विरोधी पक्षांच्या आमदारांची मुस्कटदाबी करायची. जनतेच्या समोर जाऊ, या सरकारला धडा शिकवू असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिला.

स्पीकर जप्त करण्याची कारवाई करा, विधानसभा उपाध्यक्षांचे आदेश

विरोधी पक्षाने प्रतिविधानसभा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरवली आहे. याठिकाणी विरोधकांना स्पीकर वापरण्याची परवानगी दिली नाही मग त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी केली. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवळ यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचसोबत भास्कर जाधव यांना धमक्या देण्यात येत असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhaskar Jadhavभास्कर जाधव