शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

"वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू"; भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:19 IST

Maharashtra Legislative Assembly BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

मुंबई - विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सोमवारी सभागृहात बोलत असताना विरोधी बाकावरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माइक ओढला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या 12 पैकी चौघे माजी कॅबिनेटमंत्री राहिले आहेत. याच दरम्यान भाजपाने आता ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

"वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू" असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनात काल सोमवारी नियोजित बनाव रचून माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन  करण्यात आले. या दंडेली विरुद्ध कांदिवली पूर्व विधानसभेत संतप्त निदर्शने करण्यात आली. वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय?"

"ज्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अर्वाच्च शिवीगाळ केली त्यांनीच माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. शकुनीने कपटाने फासे टाकलेत, पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहते आहे. आज लोकांनी रस्त्यावर उरतून वसूली सरकार आणि घरबशा मुख्यमंत्र्यांचा उत्स्फूर्त निषेध केला" असं देखील अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. याआधीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. 170 आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे…." असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

"आमदारकी गेली तर चालेल, रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील; निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही"

भाजपाचे आमदार राम सातपुते (BJP Ram Satpute) यांनी "आम्ही शिवीगाळ केलेली नाही. एक कथा रचून आमचं निलंबन करण्यात आलं. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आमदारकी गेली तरी चालेल. पण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार. बारा आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही" असं म्हटलं आहे. तसेच सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत ट्विट केलं आहे. "ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले... आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो" असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण