शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला रोखण्यासाठी महाराष्ट्र फॉर्म्युला, काँग्रेसने या राज्यात पाच पक्षांसोबत केली महाआघाडी

By बाळकृष्ण परब | Updated: January 20, 2021 16:07 IST

Congress Politics News : भाजपाची आगेकूच रोखण्यासाठी महाराष्ट्रात करण्यात आलेली महाविकास आघाडी कमालीची यशस्वी ठरली आहे. आता महाराष्ट्रातील हा फॉर्म्युला काँग्रेसने देशातील इतर राज्यांतही वापरण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसने आता आसाममध्ये महाआघाडीचा घाट घातला आहेआसाममध्ये काँग्रेस, एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल) आमि आंचलिक गण मोर्चा असे सहा पक्ष एकत्र आले आहेकाँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ या पक्षांनी पुढाकार घेत ही आघाडी केली आहे

गुवाहाटी - स्पष्ट बहुमतासह केंद्रात सत्ता आणि विविध राज्यांत सरकारे स्थापन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कसे रोखायचे, याबाबत विरोधी पक्षांमध्ये सातत्याने चर्चा सुरू असते. दरम्यान, भाजपाची आगेकूच रोखण्यासाठी महाराष्ट्रात करण्यात आलेली महाविकास आघाडी कमालीची यशस्वी ठरली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रातील हा फॉर्म्युला काँग्रेसने देशातील इतर राज्यांतही वापरण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने पूर्वोत्तर भारतातील मोठे राज्य असलेल्या आसाममध्येभाजपाला रोखण्यासाठी महाआघाडी आकारास आणली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या महाआघाडीत एकूण पाच पक्ष सहभागी झाले असून, यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करत सत्तेमधून दूर ठेवले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीने विविध निवडणुकांत भाजपाला एकीच्या बळाचा दणका देण्यात यश मिळवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता आसाममध्ये महाआघाडीचा घाट घातला आहे. आसाममध्ये काँग्रेस, एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल) आमि आंचलिक गण मोर्चा असे सहा पक्ष एकत्र आले आहे. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ या पक्षांनी पुढाकार घेत ही आघाडी केली आहे. तसेच या आघाडीमध्ये काही डावे पक्षसुद्धा सहभागी होणार आहे. आसामच्या जनतेच्या हितासाठी हे सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. आता अन्य भाजपाविरोधी पक्षांनीही आपल्यासोबत या महाआघाडीमध्ये यावे, असे आवाहन या पक्षांच्या नेत्यांनी केले आहे.दरम्यान, २०१६ मध्ये झालेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने १२६ पैकी ६० जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने १४ आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटने १२ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला २६ जागा मिळाल्या होत्या. बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाला १३ जागा मिळाल्या होत्या. तर डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आला नव्हता.

टॅग्स :congressकाँग्रेसAssamआसामAll India United Democratic Frontआॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटPoliticsराजकारणBJPभाजपा