शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला रोखण्यासाठी महाराष्ट्र फॉर्म्युला, काँग्रेसने या राज्यात पाच पक्षांसोबत केली महाआघाडी

By बाळकृष्ण परब | Updated: January 20, 2021 16:07 IST

Congress Politics News : भाजपाची आगेकूच रोखण्यासाठी महाराष्ट्रात करण्यात आलेली महाविकास आघाडी कमालीची यशस्वी ठरली आहे. आता महाराष्ट्रातील हा फॉर्म्युला काँग्रेसने देशातील इतर राज्यांतही वापरण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसने आता आसाममध्ये महाआघाडीचा घाट घातला आहेआसाममध्ये काँग्रेस, एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल) आमि आंचलिक गण मोर्चा असे सहा पक्ष एकत्र आले आहेकाँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ या पक्षांनी पुढाकार घेत ही आघाडी केली आहे

गुवाहाटी - स्पष्ट बहुमतासह केंद्रात सत्ता आणि विविध राज्यांत सरकारे स्थापन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कसे रोखायचे, याबाबत विरोधी पक्षांमध्ये सातत्याने चर्चा सुरू असते. दरम्यान, भाजपाची आगेकूच रोखण्यासाठी महाराष्ट्रात करण्यात आलेली महाविकास आघाडी कमालीची यशस्वी ठरली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रातील हा फॉर्म्युला काँग्रेसने देशातील इतर राज्यांतही वापरण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने पूर्वोत्तर भारतातील मोठे राज्य असलेल्या आसाममध्येभाजपाला रोखण्यासाठी महाआघाडी आकारास आणली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या महाआघाडीत एकूण पाच पक्ष सहभागी झाले असून, यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करत सत्तेमधून दूर ठेवले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीने विविध निवडणुकांत भाजपाला एकीच्या बळाचा दणका देण्यात यश मिळवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता आसाममध्ये महाआघाडीचा घाट घातला आहे. आसाममध्ये काँग्रेस, एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल) आमि आंचलिक गण मोर्चा असे सहा पक्ष एकत्र आले आहे. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ या पक्षांनी पुढाकार घेत ही आघाडी केली आहे. तसेच या आघाडीमध्ये काही डावे पक्षसुद्धा सहभागी होणार आहे. आसामच्या जनतेच्या हितासाठी हे सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. आता अन्य भाजपाविरोधी पक्षांनीही आपल्यासोबत या महाआघाडीमध्ये यावे, असे आवाहन या पक्षांच्या नेत्यांनी केले आहे.दरम्यान, २०१६ मध्ये झालेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने १२६ पैकी ६० जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने १४ आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटने १२ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला २६ जागा मिळाल्या होत्या. बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाला १३ जागा मिळाल्या होत्या. तर डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आला नव्हता.

टॅग्स :congressकाँग्रेसAssamआसामAll India United Democratic Frontआॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटPoliticsराजकारणBJPभाजपा