शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

Cabinet Reshuffle: महाराष्ट्र मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, काँग्रेसच्या ‘या’ २ मंत्र्यांना डच्चू?; दिल्लीत मोठ्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:29 IST

काँग्रेसच्या या दोन्ही चेहऱ्यांऐवजी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येऊ शकतो.

ठळक मुद्दे१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणाचा आरोप असल्याने राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नाव आल्यानं संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होतामंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसच्या दोन चेहऱ्यांना वगळण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू आहे.

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून यात अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिली जाणार असल्याची शक्यता आहे.यात आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा नावाचा समावेश असल्याची माहिती आहे.(Uddhav Thackeray Cabinet Expansion)

काँग्रेसच्या या दोन्ही चेहऱ्यांऐवजी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येऊ शकतो. के. सी पाडवी यांच्याजागी आदिवासी चेहरा तर अस्लम शेख यांच्या जागी मुस्लीम चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणाचा आरोप असल्याने राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नाव आल्यानं संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या दोघांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीकडील प्रत्येकी एक मंत्रिपद रिक्त आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसच्या दोन चेहऱ्यांना वगळण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू आहे. अलीकडेच नितीन राऊत यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातही दिल्लीत भेटीगाठी घेणार आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून तिन्ही पक्ष मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सतेज पाटील यांना बढती मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. सतेज पाटील यांच्याकडे सध्या शहर गृहराज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे.

अलीकडेच काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या कामकाजाची माहिती घेतली आहे. याची समिक्षा करून दोन काम न करणाऱ्या किंवा प्रदर्शन खराब असलेल्या मंत्र्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या  खात्यांपैकी दोन मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासह मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

सध्या कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदं?

मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर भाजपा आणि शिवसेना वेगळी झाली. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीची हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापना केली. २०१९ मध्ये सत्तांतर करताना शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १२ मंत्रिपदं त्यात ८ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं देण्यात आली. काँग्रेसला १० पैकी ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्रिपदं आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १४ मंत्रिपदं त्यात १० कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस