शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होऊ देणार नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 5:41 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे.

आसामः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे. गोलाघाटमध्ये एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, नागरिकत्व विधेयक कधीही मंजूर होऊ देणार नाही. न्याय योजनेवरून मोदींनी केलेल्या टीकेलाही राहुल गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.न्याय योजनेसाठी त्या चोरांच्या खिशातूनच पैसे येणार आहेत, ज्यांना मोदी वाचवत आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ईशान्य भारतावर हल्ला होऊ देणार नाही. एकीकडे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं मोदी सरकारनं खोटं आश्वासन दिलं, तर दुसरीकडे काँग्रेस पार्टीनं तुम्हाला  72 हजार रुपये देण्याचं खरं आश्वासन दिलं आहे. भारतातल्या 20 टक्के गरीब लोकांच्या खात्यात काँग्रेस पाच वर्षांत 3 लाख 60 हजार रुपये खात्रीशीररीत्या जमा करणार आहे. मोदींनी पाच वर्षांत कोट्यवधी लोकांना बेरोजगार केलं आहे.सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी मोठ-मोठी आश्वासनं दिली होती. परंतु त्यातील कोणतंही आश्वासन मोदींनी पूर्ण केलेलं आहे काय?, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याच्या आश्वासनाची अद्यापही पूर्ती केलेली नाही. आमचं सरकार सत्तेवर आल्यास महिन्याकाठी 12 हजारांहून कमी उत्पन्न असलेल्या लोकांची एक यादी तयार केली जाईल, त्या सर्वांच्या खात्यात काँग्रेस सरकार 72 हजार जमा करणार आहे. देशातील लाखो तरुण व्यवसाय सुरू करू इच्छितात. परंतु त्यासाठी सद्यस्थितीतील सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु आमचं सरकार आल्यावर कोणालाही व्यवसाय करायचा असल्यास परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAssam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019