शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

'मोदी पाच वर्षांतील विकासकामांवर का बोलत नाहीत?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:03 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल

परभणी :  गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेला निवडून देऊनही जिल्हा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. त्यामुळे झालेल्या चुकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी तालुक्यातील जाहीर सभेमधून शिवसेनेवर केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मोदी गेल्या पाच वर्षांतील विकासकामांवर का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, टाकळी बोबडे येथे रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वर्धा, गोंदिया, नांदेड या ठिकाणी  झालेल्या तिन्ही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यावरच खालच्या पातळीत टीका चालवली आहे. इतिहास पूर्णपणे झाकून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याची ते प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्ष गेल्या ५ वर्षातील विकासकामांवर ते का बोलत नाहीत? स्वत:च्या अजेंड्यावर का? बोलत नाहीत, त्यांचा खोटारडेपणा जनतेने ओळखला आहे. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना आता कोणीही बळी पडणार नाही, अशी टीका त्यांनी केली. जयंत पाटील यांनी भाजपासोबतच शिवसेनेवरही शरसंधान साधलं. ३० वर्षांपासून जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेचा खासदार निवडून दिला. तरीही जिल्ह्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे झालेल्या चुकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या अधोगतीला शिवसेनेबरोबरच भाजपाही तेवढीच जबाबदार आहे. शिवसेनेला ३० वर्षे दिलीत. आता एकदा राष्ट्रवादीला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, आ. मधुसूदन केंद्रे, आ. विजय भांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, उमेदवार राजेश विटेकर, माजी आ. सुरेश देशमुख, माजी खा. सुरेश जाधव,  अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, प्रताप देशमुख,  भावनाताई नखाते, नंदा राठोड, संतोष बोबडे, किरण सोनटक्के, रमाकांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीparbhani-pcपरभणीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना