शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'मोदी पाच वर्षांतील विकासकामांवर का बोलत नाहीत?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:03 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल

परभणी :  गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेला निवडून देऊनही जिल्हा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. त्यामुळे झालेल्या चुकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी तालुक्यातील जाहीर सभेमधून शिवसेनेवर केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मोदी गेल्या पाच वर्षांतील विकासकामांवर का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, टाकळी बोबडे येथे रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वर्धा, गोंदिया, नांदेड या ठिकाणी  झालेल्या तिन्ही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यावरच खालच्या पातळीत टीका चालवली आहे. इतिहास पूर्णपणे झाकून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याची ते प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्ष गेल्या ५ वर्षातील विकासकामांवर ते का बोलत नाहीत? स्वत:च्या अजेंड्यावर का? बोलत नाहीत, त्यांचा खोटारडेपणा जनतेने ओळखला आहे. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना आता कोणीही बळी पडणार नाही, अशी टीका त्यांनी केली. जयंत पाटील यांनी भाजपासोबतच शिवसेनेवरही शरसंधान साधलं. ३० वर्षांपासून जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेचा खासदार निवडून दिला. तरीही जिल्ह्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे झालेल्या चुकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या अधोगतीला शिवसेनेबरोबरच भाजपाही तेवढीच जबाबदार आहे. शिवसेनेला ३० वर्षे दिलीत. आता एकदा राष्ट्रवादीला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, आ. मधुसूदन केंद्रे, आ. विजय भांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, उमेदवार राजेश विटेकर, माजी आ. सुरेश देशमुख, माजी खा. सुरेश जाधव,  अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, प्रताप देशमुख,  भावनाताई नखाते, नंदा राठोड, संतोष बोबडे, किरण सोनटक्के, रमाकांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीparbhani-pcपरभणीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना