शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

देवेंद्र फडणवीस बसवलेला मुख्यमंत्री; राज ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 20:27 IST

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला नेलं जात असल्याचा राज यांचा दावा

नांदेड: देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्री पाणी प्रश्नावर काहीच करत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पण तरीही राज्यातलं पाणी गुजरातला वळवायचं काम सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंडातून चकार शब्द काढत नाही. कारण बसवलेला मुख्यमंत्री काय बोलणार?, अशा शब्दांमध्ये राज यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. पाण्यावरुन वाद सुरू आहेत. मात्र अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं पाणी गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण याविरोधात बोलण्याची महाराष्ट्र सरकारची हिंमत नाही. कारण बसवलेला मुख्यमंत्री काहीही करु शकत नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. राज्यातलं पाणी गुजरातला नेलं जातं आहे. मराठवाडा, नाशिकचं पाणी गुजरातकडे वळवण्याचं काम सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस तोंडातून चकार शब्द काढत नाही, अशी टीका राज यांनी केली.राज्यातील 24 हजार गावं, 151 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचं सरकारनं जाहीर केलं. मग सरकारनं पाण्यासाठी काय योजना केल्या? राज्यात 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या असा दावा मुख्यमंत्री करतात. कुठे आहेत या विहिरी? असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. राज्यातील परिस्थिती भीषण आहे. पाण्याची समस्या गंभीर आहे. नोकऱ्या नाहीत. माणसांचे तांडेच्या तांडे शहरांकडे चालले आहेत. मग मोदींनी दाखवलेल्या स्वप्नांचं काय झालं? असा सवाल राज यांनी विचारला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nanded-pcनांदेडRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात