शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अखेर मोदींनी पत्रकार परिषद घेतली, पण एकटेच बोलले... पत्रकारांचे प्रश्न टाळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:42 IST

पत्रकारांच्या प्रश्नांना अमित शहांनी दिली उत्तरं

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर आज पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान झाल्यानंतरची मोदींची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. मात्र या पत्रकार परिषदेत मोदी एकटेच बोलले. पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी उत्तर दिली. मोदींनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असंदेखील शहा पत्रकार परिषदेत म्हणाले.पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित करताना सर्वच प्रश्नांची उत्तरं शहांनी दिली. पंतप्रधानांना विचारण्यात आलेला एक प्रश्न त्यांनी मोठ्या खुबीनं शहांकडे टोलवला. 'मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,' असं मोदी म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरं देण्याची आवश्यकता नाही, असं शहांनी म्हटलं.भाजपाच्या पत्रकार परिषदेला अमित शहांनी सुरुवात केली. त्यांनी मोदी सरकारच्या योजनांची विस्तृत माहिती दिली. यानंतर मोदींनी पत्रकारांशी बोलण्यास सुरुवात केली. 'आधी माझं हेच काम असायचं. संध्याकाळी पक्ष कार्यालयात यायचं. पत्रकार मित्रांशी संवाद साधायचा. आज दिवसभर मध्य प्रदेशात होतो. त्यामुळे येण्यास उशीर झाला,' असं मोदी सुरुवातीला म्हणाले. लोकसभा निवडणूक सुरू असताना आयपीएल, रमजानदेखील झाला. हीच लोकशाहीची ताकद असल्याचं मोदींनी म्हटलं.आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून निवडणुकीला सामोरे गेलो. जनता पुन्हा एकदा बहुमत देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच पक्षाचं बहुमताचं सरकार केंद्रात सत्तेत पुन्हा येणार, हे कित्येक वर्षांनंतर देशात घडेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. देशातल्या जनतेनं गेल्या पाच वर्षांत कायम साथ दिली. अनेक चढ-उतार आले. पण देश कायम सरकारच्या पाठिशी राहिला, असं म्हणत मोदींनी देशवासीयांचे आभार मानले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शहा