शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

राहुल गांधींमध्ये दिसतो भविष्यातील पंतप्रधान; लालूंची कन्या भरभरून बोलली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 7:31 PM

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे.

ठळक मुद्देलालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं मीसा भारती यांनी म्हटलंय.

'फिर एक बार, मोदी सरकार'चा नारा देत, भाजपा आणि सत्ताधारी एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडणूक लढवत आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षही जोमाने मैदानात उतरलेत. काही ठिकाणी काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांचा हात धरून महाआघाडीही केलीय. पण, त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. अशातच, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं त्यांनी अगदी जाहीर करून टाकलंय. स्वाभाविकच, काँग्रेसला नवी उमेद मिळाली असून कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी मीसा भारतीही रिंगणात उतरल्या आहेत. २०१४च्या निवडणुकीत पाटलीपुत्र मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपाचे राम कृपाल यादव इथून विजयी झाले होते. परंतु, यावेळी पुन्हा याच मतदारसंघातून मीसा भारती आपलं नशीब अजमावत आहेत. लालूप्रसाद तुरुंगात आहेत, कुटुंबात कलह आहे, तरीही त्यांनी प्रचारात झोकून दिलंय. या पार्श्वभूमीवर, इंडियन एक्स्प्रेसनं त्याची मुलाखत घेतली. त्यात राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल मीसा भारतींनी अगदी मोकळेपणानं मत मांडलं. 

राहुल गांधीकडे मी भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहते. संवेदनशीलता आणि दूरदृष्टीच्या जोरावर भारतातील सर्वात जुन्या पक्षाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे. भारतामध्ये सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक विविधता आहे आणि आर्थिक आणि सामाजिक विषमता आजही पाहायला मिळते. असं असताना, आत्मकेंद्री नेत्याऐवजी केवळ एक हळवा आणि उदार नेताच या देशाला समृद्धीकडे नेऊ शकतो, अशा शब्दांत मीसा भारती यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांबद्दल विश्वास व्यक्त केला. 

सत्तेत आल्यास पंतप्रधान होण्यास तयार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. अर्थात, पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी किंवा कुणा अन्य नेत्याच्या नावावर महाआघाडीत एकमत नाही. त्यामुळेच, मीसा भारती यांनी केलेलं राहुल यांचं गुणगान काँग्रेससाठी विशेष महत्त्वाचं आहे.

दरम्यान, कुटुंबात कुठलेही मतभेद नाहीत, तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्यात कलह नाही, असा दावा मीसा भारती यांनी केला. उमेदवारांच्या निवडीवरून थोडी फार नाराजी प्रत्येक पक्षात असतेच, पण ती क्षणिक होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019pataliputra-pcपाटलीपुत्रLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव