शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Lok Sabha Election 2019: राष्ट्रवादीत ठाणे लोकसभा उमेदवाराबाबत संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 01:14 IST

नाईक पिता-पुत्रांचा नकार कायम : महापौर जयवंत सुतार यांच्या नावाची चाचपणी

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे; परंतु ठाणे लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत संभ्रम कायम आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास असहमती दर्शविली आहे. तर बदलेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा नाईक यांचे पुत्र संजीव नाईक हेसुद्धा या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास फारसे इच्छुक नसल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोठात नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे समजते.ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो. २0१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेचा फटका नाईक कुटुंबीयांना बसला. शिवसेनेचे राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव केला, तर त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा क्षेत्रातून पराभव पत्करावा लागला.निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे यांनी नाईकांचा या निवडणुकीत पराभव केला; परंतु ऐरोली विधानसभा क्षेत्रातून नाईकांचे दुसरे पुत्र संदीप नाईक यांनी अवघ्या साडेआठ हजार मतांची आघाडी घेत आपली जागा राखली. एकूणच २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या तडाख्यात नाईकांच्या घराणेशाहीला जबरदस्त हादरा बसला; परंतु त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत महापालिकेतील आपली सत्ता अबाधित ठेवली.नवी मुंबई महापालिका आणि या महापालिका क्षेत्रातील ऐरोली विधानसभा क्षेत्राचा अपवाद सोडता ठाणे लोकसभा क्षेत्रातील पाच विधानसभा आणि महापालिका शिवसेना आणि भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक तितकीच जोखमीची ठरणार आहे.लोकसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक यांना तीन लाख १०० मते मिळाली होती. यात ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातून मताची आघाडी अधिक होती. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे विजय चौगुले यांचा जवळपास ५० हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाईक यांना जवळपास तितकीच म्हणजेच तीन लाख १४ हजार मतांवर समाधान मानावे लागले. ऐरोली आणि बेलापूर क्षेत्रातून त्यांचे मताधिक्य गतनिवडणुकीच्या तुलनेत घटल्याचे दिसून आले.पनवेल-उरणमध्ये आघाडीचे नवीन समीकरणमावळमध्ये कर्जत, उरण आणि पनवेलमधील तीन विधानसभा मतदारसंघ तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड असे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. मावळ मतदारसंघाची पहिली निवडणूक आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि युतीतील शिवसेनेचे गजानन बाबर यांच्यामध्ये झाली. त्यात बाबर यांनी बाजी मारली.यंदा मावळ मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी, असे प्रयत्न सुरू आहेत. खासदार बारणे यांनी पाचही वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, दांडगा लोकसंग्रह, निधीचे नियोजन आणि अगदी तळागाळात,दुर्गम भागात जाऊन काम करण्याचे तंत्र यामुळे हा मतदारसंघ शिवसेना सहजासहजी सोडेल की नाही? हे सांगता येत नाही.गेल्या वेळी शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवित लक्ष्मण जगताप यांनी सुमारे साडेतीन लाख मते मिळवून आपली चुणूक दाखविली होती. मात्र, यंदा शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा तगडा उमेदवार दिल्यास मतदारसंघाचे चित्र बदलेल, असे वाटते.त्यामुळे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची नावे चर्चेत आली होती. खुद्द स्मिता पाटील यांनी उमेदवारी लढणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पार्थ पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पवार आणि बारणे यांच्यामधील लढत रंगतदार होईल हे नक्की.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९NCPराष्ट्रवादी काँग्रेसNavi Mumbaiनवी मुंबई