शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

Lok Sabha Election 2019: उत्तर प्रदेशात उमेदवार घोषित करून काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 04:58 IST

प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम; राहुल गांधी यांच्यासह ११ जणांची यादी जाहीर

- धनाजी कांबळेउत्तर प्रदेशातील निवडणूक देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष राहणार आहे. विशेषत: भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ याच राज्यात असल्याने या ठिकाणी ‘काँटे की टक्कर’ होईल, अशीच परिस्थिती आहे.एकीकडे भाजपाचा वारू रोखण्यासाठी सपा, बसपा यांनी आघाडी केली असताना, काँग्रेस मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याने उत्तर प्रदेशातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा देखील मतदारसंघ उत्तर प्रदेशातच असल्याने तुल्यबळ लढती होणार आहेत. यात आता मोदी लाट ओसरली असली, तरी कुणाच्याही विजयाची खात्री देता येत नसल्याने उमेदवार देतानाही राजकीय पक्षांची दमछाक होणार आहे.काँग्रेसचा विचार करता प्रियंका गांधी यांना प्रत्यक्ष राजकारणात आणल्यावर त्या रायबरेलीतून रिंगणात उतरतील अशी अटकळ तज्ज्ञांनी बांधली होती. मात्र, काँग्रेसने सर्व पक्षांमध्ये आघाडी घेऊन ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अमेठीतून राहुल गांधी, तर रायबरेलीतून सोनिया गांधी उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रियंका गांधी कोणत्या मतदारसंघातून रिंगणात उतरतील, याबाबत अद्याप संदिग्धता ठेवण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून सपा-बसपावर दबाव टाकण्याचाही डाव टाकलेला आहे, हे विशेष.काँग्रेसने एकूण १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ११ जण उत्तर प्रदेशातील, तर ४ जण गुजरातसाठी जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात देशात घडलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न भाजपा करेल, अशी शक्यता वाटत असतानाच बसपाच्या सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री मायावती आणि सपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याची स्थिती आहे. काँग्रेसदेखील राफेल, सीबीआय, सर्वोच्च न्यायालय, आरबीआय अशा संवैधानिक संस्थांमध्ये सत्ताधारी सरकारचा होत असलेला हस्तक्षेप यावर टीकाटिप्पणी करणे सुरूच ठेवले आहे.सपा, बसपासोबत येणार काँग्रेस?उत्तर प्रदेशात जानेवारीमध्ये जी परिस्थिती होती, त्यात बदल झाला आहे. सपा आणि बसपा यांच्या आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा काँग्रेसने व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. जागा किती सोडायच्या एवढाच मुद्दा शिल्लक असून, ९+२ अशी आॅफर काँग्रेसला देण्यात आली आहे. याआधी काँग्रेस २० जागा मागत होती. पण, आता १७ जागांवर चर्चा आली आहे. १३+२ काँग्रेस तयार होईल, असा अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे सपा-बसपाने अमेठी, रायबरेलीची जागा काँग्रेससाठी आधीच सोडली आहे.उत्तर प्रदेशात सवर्ण मतदारांचे प्रमाण २१ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. सवर्णांमध्ये ब्राह्मण आणि भूमिहीन ९ ते १० टक्के, ठाकूर व राजपूत ८ टक्के आणि वैश्य (बनिया) ३ टक्के आहेत. २०१४ व २०१७ च्या उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये सवर्णांनी भाजपाला जवळपास एकगठ्ठा मतदान केले होते. २०१३-१४ मध्ये अमित शहांनी सवर्ण जातींना भाजपाच्या जवळ आणले. आता १० टक्के सवर्ण आरक्षणाचा भाजपाला फायदा होऊ शकतो. ८ टक्के ब्राह्मण मतदार, बसपाशी असंतुष्ट असलेले ८ टक्के दलित मतदार यांना ज्या-ज्या मतदारसंघात काँग्रेस स्वत:च्या मंचावर आणू शकेल, तिथे राज्यात १९ टक्के असलेला मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मत देईल, अशी स्थिती उत्तर प्रदेशात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश