शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Lok Sabha Election 2019: शिवसेनेच्या विचारेंना भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 01:09 IST

शिवसेना आणि भाजपाची युती झाल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे; परंतु भाजपाच्या २३ नगरसेवकांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे.

ठाणे : शिवसेना आणि भाजपाची युती झाल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे; परंतु भाजपाच्या २३ नगरसेवकांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत हा विरोध मावळलेला असेल, असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. दुसरीकडे, लोकशाही आघाडीत अद्यापही उमेदवारीबाबत संभ्रम कायम असून, हा मतदारसंघ माजी मंत्री गणेश नाईक यांनी लढवावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली आहे; परंतु नाईक अद्याप इच्छुक नसल्याचे समजते.ठाणे लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास येथील दोन मतदारसंघ शिवसेनेकडे असून, एक मतदार संघ भाजपाकडे आहे. नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, तर एक भाजपाकडे आहे. मीरा-भार्इंदर विधानसभा क्षेत्रावरही भाजपाचेच वर्चस्व असून, ही युतीसाठी जमेची बाजू मानली जात आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात मात्र केवळ ऐरोली हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळेच नाईक कुटुंब ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे युतीचा बिगुल वाजला असला, तरी राजन विचारे यांच्या नावाला ठाण्यातील भाजपाच्या सर्वच्या सर्वच २३ नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे; परंतु इतर मतदारसंघांमध्ये शिवसेनेची मंडळी ज्याप्रमाणे भाजपाच्या उमेदवाराला विरोध करीत आहेत, त्याचप्रकारे ठाण्यात सेनेला भाजपाचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली, तरी ठाणे, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईत काँग्रेसचे दमदार अस्तित्व नाही. त्यामुळे निवडणुकीची खिंड राष्ट्रवादीला एकट्यानेच लढवावी लागणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मनसेने या मतदारसंघात निवडणूक लढविली होती. यंदा निवडणूक लढवायची की नाही, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नाही.राष्ट्रवादीचा एकच आमदार२०१४ नंतर झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत ठाणे महापालिकेत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. भाजपाचे येथे २३ नगरसेवक आहेत. नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीची सत्ता आहे.आघाडीत असलेल्या काँग्रेसचे मीरा-भार्इंदरमध्ये १३, ठाण्यात दोन आणि नवी मुंबईत दहा नगरसेवक आहेत. त्यामुळे याचा आघाडीच्या उमेदवाराला कितपत फायदा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा