शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

LMOTY 2020: जी-२३ काँग्रेसविरोधी नव्हे; सुशील कुमार शिंदेनी दिला पक्षाच्या इतिहासाचा दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 10:34 IST

LMOTY 2020: इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळातही पक्षात दबावगट होता; शिंदेंनी दिला इतिहासातील संदर्भ

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. त्यावरून पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. मात्र तरीही अद्याप पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळालेला नाही. यावर भाष्य करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी (Sushil Kumar Shinde) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नावाला पसंती दिली. राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं अशी देशातील तरुणांची इच्छा. काँग्रेस पक्षाला ठेच लागली आहे. त्यामुळे पक्ष आवश्यक सुधारणा नक्की करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) बोलत होते....म्हणून आझादांच्या जागी खर्गेना संधी; सुशील कुमारांनी सांगितलं काँग्रेसचं 'राज'कारणकाही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधील २३ बड्या नेत्यांनी पक्षात निवडणुकीत व्हाव्यात, पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा, पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल व्हावेत, अशी मागणी केली. अनेक माजी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री असलेला हा गट जी-२३ नावानं ओळखला जातो. त्यावरही सुशीलकुमार शिंदेंनी भाष्य केलं. जी-२३ गट काँग्रेसविरोधी नाही. पक्षात सुधारणा व्हाव्यात अशीच या गटाची इच्छा आहे. मात्र माध्यमांनी हा विषय मोठा केला, असं शिंदेंनी म्हटलं.राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत ही तर देशातील तरुणांची इच्छा- सुशील कुमार शिंदे

काँग्रेसमध्ये विविध सूर असतात, मतमतांतरं असतात. यातून चर्चा होते आणि मार्ग निघतो, असं सांगताना शिंदेंनी इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालावधीत घडलेल्या घटनांची उदाहरणं दिली. इंदिरा गांधी, नेहरूंच्या काळातही पक्षात दबावगट तयार झाला होता. काँग्रेसमध्ये अशा घटना होतच असतात. पण तो गट काही पक्षाच्या विरोधात नसतो. त्यांच्यासोबत चर्चा होणं गरजेचं असतं. जी-२३ प्रकरणही तसंच आहे. माध्यमांनी हा विषय मोठा केला, असं मत शिंदेंनी व्यक्त केलं.ईडीची मोठी कारवाई! सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता केली जप्त

राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसनं मल्लिकार्जुन खर्गेंना निवड केली. गुलाम नबी आझाद यांच्या खासदारकीचा कालावधी संपताच काँग्रेस नेतृत्त्वानं त्यांना पुन्हा संधी दिली नाही. यानंतर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. यामागचं राजकारण काँग्रेसचे ज्येष्ठ सुशीलकुमार शिंदेंनी (Sushil Kumar Shinde) सांगितलं आहे. सगळ्यांना संधी मिळायला हवी या हेतूनं खर्गेंची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली, असं शिंदे म्हणाले. राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात प्रगल्भ नेत्यांची आवश्यकता असते. त्यामुळेच मल्लिकार्जुन खर्गेंना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. सगळ्यांना संधी देता यावी यासाठीच आझाद यांना दुसरी टर्म दिली गेली नाही, असं शिंदेंनी सांगितलं. काँग्रेसला ठेच लागली आहे. यातूनच सुधारणा होतील. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, ही पक्षातील युवाशक्तीची इच्छा आहे, असं ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020