शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

लिंगायत: राजीव गांधी, अडवाणींसारखी चूक परवडणार नाही; येडीयुराप्पांबाबत भाजपा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 16:29 IST

Karnataka Politics: कर्नाटक ही अशी भूमी आहे जिने देशाच्या राजकीय इतिहासात दिल्लीलाही मोठी मदत पुरविली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी लागली आहे.

बंगळुरु: कर्नाटक (Karnataka) ही अशी भूमी आहे जिने देशाच्या राजकीय इतिहासात दिल्लीलाही मोठी मदत पुरविली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी लागली आहे. अशा या कर्नाटकात सध्या लिंगायत असा मुद्दा बनला आहे, जो भाजपाला देखील नामोहरम करु शकतो. यामुळे कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाचे वारे असले तरी देखील भाजपाच्या वरिष्ठांना तिथे ताकही फुंकून प्यावे लागत आहे. सध्या मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा (BS yediyurappa) त्या समाजाचे निर्विवाद वर्चस्व असलेले नेते आहेत. (BJP want to take resigne of BS yediyurappa, but histry told lesson to Rajiv Gandhi and LK Advani.)

येडीयुराप्पा फक्त लिंगायतच नाहीत तर अल्पसंख्यांक आणि अन्य समाजाच्या नेत्यांशी देखील चांगले संबंध ठेवलेले नेते आहेत. यामुळे त्यांना त्रास देणे सोपी गोष्ट नाहीय. देशाच्या स्वातंत्र्याआधीही लिंगायत समाजच तिथे प्रबळ होता. 1956 पासून 1969 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसचे विभाजन होईस्तोवर तिथे लिंगायतच मुख्यमंत्री होता. 

राजीव गांधींकडून काय चूक झालेली....इंदिरा गांधी यांच्यानंतर काँग्रेसचे नेते आणि पंतप्रधान राजीव गांधींनी एक मोठी चूक केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विरेंद्र पाटील यांना नवी दिल्लीला रवाना होण्याआधीी विमानताळावरून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. यानंतर लिंगायत समाजाची मते भाजपाकडे वळली. या घटनेच्या एक वर्ष आधी पाटील यांनी काँग्रेसला 224 पैकी 184 जागांवर विजय मिळवून दिला होता. या नंतर भलेही काँग्रेस दोनदा सत्तेत आली परंतू महत् प्रयास करूनही लिंगायतांना आपल्या बाजुला आणण्यास काँग्रेस असफल ठरली होती. 

2011 मध्ये भाजपाने ती चूक केली होती. येडीयुराप्पांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास एल के अडवाणी यांनी सांगितले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र, येडीयुराप्पांनी थेट पक्षच सोडत नवा पक्ष स्थापन केला होता. यानंतर आलेल्या 2013 च्या निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. येडीयुराप्पा यांनी 10 टक्के मते खाल्ली होती आणि सहा आमदार निवडूण आणले होते. आता भाजपाला ते पुन्हा करायचे नाहीय. भाजपाने यासाठी येडीयुराप्पांचे वय कारण ठेवले आहे. येडीयुराप्पा 78 वर्षांचे आहेत. त्यांना चांगल्या प्रकारे निरोप न दिल्यास लिंगायत समाज दुरावण्याची भीती दिल्लीतील नेत्यांना वाटत आहे. यामुळे येडीयुराप्पा भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे, असे राजकीय धुरिणांनी सांगितले आहे. 

येडीयुराप्पांच्या तीन अटी...यासाठी लिंगायत समाजाच्याच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यासाठी येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत. 

चार नावे चर्चेत... (Who is next CM of Karnataka)यामुळे सध्या चार नावांची चर्चा आहे. 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत आहेत. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. आता भाजपा नेतृत्व येडीयुराप्पांचे लाड पुरविते की यतनाल यांना मुख्यमंत्री करते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधी