शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Mumbra Hospital Fire: 'ही वेळ राजकारणाची नाही'; मुंब्र्यात गेलेल्या किरीट सोमय्यांना शानू पठाण यांनी पिटाळून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 12:30 IST

Prime Hospital Fire: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. कौसा येथील जळीत कांडानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन महाविकास आघाडीवर टीका केली. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करणारे शानू पठाण हे प्रचंड संतप्त झाले. त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे कोविड रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करणार्‍या सोमय्या यांना आल्या पावली परतावे लागले. 

ठाणे : प्राईम रुग्णालयाच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी येऊन “ठाकरे सरकारच्या काळात कोविड हत्याकांड सुरु आहे” असे विधान करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना  विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी चांगलेच फटकारले. “आम्ही जनतेचे जीव वाचविण्याला महत्व देत आहोत. प्रत्यक्ष मदतीच्या वेळी घरात बसणारे येथे येऊन राजकारण करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. ही वेळ राजकारणाची नाही. जगलो तर राजकारण करुच; पण, टीका करण्यापूर्वी हिम्मंत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून दाखवा, अशा शब्दात शानू पठाण यांनी सोमय्या यांचा समाचार घेतला. (Bjp's Former MP kirit somaiya went at Mumbra's Prime Hospital fire spot, NCP opposed.)

कौसा येथील जळीत कांडानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन महाविकास आघाडीवर टीका केली. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करणारे शानू पठाण हे प्रचंड संतप्त झाले. त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे कोविड रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करणार्‍या सोमय्या यांना आल्या पावली परतावे लागले. 

Prime Hospital Fire: प्राईम हॉस्पीटल दुर्घटना प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करणार; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

यावेळी पठाण म्हणाले की, आज दुर्घटनेनंतर राजकारण करण्यासाठी सोमय्या येथे आले आहेत. जेव्हा मुंब्रा-कौसा भागात अनेक लोक मरत होते, तेव्हा हे कुठे होते? रात्री आग लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता आम्ही रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले ; त्यावेळी सोमय्या कुठे होते. डॉ. जितेंद्र् आव्हाड हे दिवसरात्र काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आम्ही कोरोना रुग्णांना मदत करीत आहोत. आता हे लोक येऊन टीका करीत आहेत. अशी फुकटची टीका आम्ही सहन करणार नाही. हा मुंब्रा आहे, येथे मेहनत करणार्‍यांची कदर केली जाते. पण, काम करणार्‍यांवर टीका कराल तर आम्ही ते चालवून घेणार नाही. आज टीका करणार्‍यांची सत्ता केंद्रात आहे. केंद्र सरकारची जबाबदारी नाही का? ऑक्सिजन पुरवठा करणे, रेमडेसीवीरचा पुरवठा करणे, कोविड लसींचा पुरवठा करणे या बाबतीत हिम्मंत असेल तर केंद्र सरकारला जाब विचारुन दाखवा ना? महाराष्ट्रावर टीका करताना जर स्वत:च्या अंतर्मनातही बघा, आज भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, मध्यप्रदेशातील मृत्यूदर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. या कोविड काळात राजकारण बाजूला ठेवण्याची वेळ आहे. मात्र, किरीट सोमय्यांसारखे लोक मृत्युचे राजकारण करीत आहेत. लोकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याऐवजी सर्व संपल्यावर राजकारण करण्यासाठी येतात. त्यांनी आता तरी राजकारण बाजूला ठेवावे. आम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करतो; अन् हे लोक राजकारण करतात; त्यांनी हे ध्यानात ठेवावे की जगलो तर राजकारण करु. आणि हिम्मंत असेल तर केंद्र सरकारला त्यांनी सांगावे अन् महाराष्ट्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात सहभागी व्हावे. महाराष्ट्राची अडवणूक करणार्‍या केंद्र सरकारला सोमय्यांनी जाब विचारावा, अशा शब्दात सोमय्या यांचा पठाण यांनी समाचार घेतला.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याmumbraमुंब्राhospitalहॉस्पिटलfireआगBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस