शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

“विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय, पण...”; कपिल सिब्बलांचे रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 11:59 IST

विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसोनिया गांधी यांचे प्रयत्न कौतुकास्पदकाँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेतकपिल सिब्बल यांनी मांडली स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. तसेच राजस्थानसह काही ठिकाणी काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीनंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावर, विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. (kapil sibal says sonia gandhi initiative to bring oppn unity is commendable)

केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. विरोधकांची एकजूट आहे. २० ऑगस्टला सोनिया गांधी काँग्रेसच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (CM Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, काँग्रेस पक्षातील सुधारणांशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही, असे म्हटले आहे. 

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

सोनिया गांधी यांचे प्रयत्न कौतुकास्पद

सोनिया गांधी विरोधकांच्या एकजुटीसाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद तसेच प्रशंसनीय आहेत. मात्र, काँग्रेस पक्षात सुधारणा होत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते आम्ही करत राहणार आहोत. काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा जोश फुंकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून, यात आमचा अडथळा वाटत असेल, तर सोनिया गांधी आम्हांला बाहेरचा रस्ता दाखवू शकतात. परंतु, काँग्रेसला पुन्हा एकदा फ्रंटफूटवर आणण्याचे काम अविरतपणे सुरू राहील, असे कपिल सिब्बल यांनी नमूद केले. काँग्रेस पुन्हा एकदा मजबुतीने उभा राहिला पाहिजे, अन्यथा विरोधकांची कितीही मोठी मोट बांधली, तरी त्याला यश येणार नाही, असेही सिब्बल म्हणाले. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

तोपर्यंत भाजपाविरोधात पर्याय दिला जाऊ शकत नाही

यापूर्वी, या देशातील लोकं आम्हाला प्रश्न विचारत आहेत ते ठीक आहे. आम्ही भाजपविरोधी नाही, पण मग दुसरा पर्याय काय? मला वाटते प्रक्रिया सुरु करण्याची वेळ आली आहे. विरोधकांनी एकमेकांशी बोलण्याची वेळ आली आहे. काँग्रेसला या चर्चेतून वगळलेले नाही. राहुल गांधी पुढाकार घेत असून हा डिनर गांधींसाठी आणि गांधीसोबतच होता. राहुल गांधींना योग्य वाटत आहे, त्यापद्धतीने ते करत असून, आम्ही आमच्या परीने शक्य तसा त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेसला जोपर्यंत १२० जागा मिळत नाहीत, तोपर्यंत भाजपाविरोधात पर्याय दिला जाऊ शकत नाही, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

दरम्यान, आपल्याला देशाचा नाश करणाऱ्यापासून देशाला वाचवायचे आहे. या पक्षाचा १२५ वर्षांचा इतिहास आहे. गेल्या दोन वर्षात पक्षाकडे अध्यक्ष नाही. अध्यक्षांशिवाय पक्षा पुढे कसा जाणार हे मला माहिती नाही. हे कोणाच्या विरोधात नसून पक्षाकडे पूर्णवेळ अध्यक्ष हवा. आमच्याकडे पार्ट-टाइम अध्यक्षही नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. इतका मोठा इतिहास असणारा कोणता राजकीय पक्ष अध्यक्षांविना पुढील वाटचाल करु शकणार आहे? आम्ही काँग्रेस पक्षासाठी लढत असून आमचा लढा सुरु ठेवू, असे सांगत आम्हाला काँग्रेसला मजबूत करायचे आहे. त्यासाठी काँग्रसने सर्वात आधी कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या इच्छा समजल्या पाहिजेत. देशातील लोकांना भाजप नको असून, आम्हाला त्यांना पर्याय द्यायचा आहे. असे कपिल सिब्बल यांनी यापूर्वी म्हटले होते. 

टॅग्स :Politicsराजकारणkapil sibalकपिल सिब्बलSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस