शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

“विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय, पण...”; कपिल सिब्बलांचे रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 11:59 IST

विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसोनिया गांधी यांचे प्रयत्न कौतुकास्पदकाँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेतकपिल सिब्बल यांनी मांडली स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. तसेच राजस्थानसह काही ठिकाणी काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीनंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावर, विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. (kapil sibal says sonia gandhi initiative to bring oppn unity is commendable)

केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. विरोधकांची एकजूट आहे. २० ऑगस्टला सोनिया गांधी काँग्रेसच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (CM Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, काँग्रेस पक्षातील सुधारणांशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही, असे म्हटले आहे. 

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

सोनिया गांधी यांचे प्रयत्न कौतुकास्पद

सोनिया गांधी विरोधकांच्या एकजुटीसाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद तसेच प्रशंसनीय आहेत. मात्र, काँग्रेस पक्षात सुधारणा होत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते आम्ही करत राहणार आहोत. काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा जोश फुंकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून, यात आमचा अडथळा वाटत असेल, तर सोनिया गांधी आम्हांला बाहेरचा रस्ता दाखवू शकतात. परंतु, काँग्रेसला पुन्हा एकदा फ्रंटफूटवर आणण्याचे काम अविरतपणे सुरू राहील, असे कपिल सिब्बल यांनी नमूद केले. काँग्रेस पुन्हा एकदा मजबुतीने उभा राहिला पाहिजे, अन्यथा विरोधकांची कितीही मोठी मोट बांधली, तरी त्याला यश येणार नाही, असेही सिब्बल म्हणाले. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

तोपर्यंत भाजपाविरोधात पर्याय दिला जाऊ शकत नाही

यापूर्वी, या देशातील लोकं आम्हाला प्रश्न विचारत आहेत ते ठीक आहे. आम्ही भाजपविरोधी नाही, पण मग दुसरा पर्याय काय? मला वाटते प्रक्रिया सुरु करण्याची वेळ आली आहे. विरोधकांनी एकमेकांशी बोलण्याची वेळ आली आहे. काँग्रेसला या चर्चेतून वगळलेले नाही. राहुल गांधी पुढाकार घेत असून हा डिनर गांधींसाठी आणि गांधीसोबतच होता. राहुल गांधींना योग्य वाटत आहे, त्यापद्धतीने ते करत असून, आम्ही आमच्या परीने शक्य तसा त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेसला जोपर्यंत १२० जागा मिळत नाहीत, तोपर्यंत भाजपाविरोधात पर्याय दिला जाऊ शकत नाही, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

दरम्यान, आपल्याला देशाचा नाश करणाऱ्यापासून देशाला वाचवायचे आहे. या पक्षाचा १२५ वर्षांचा इतिहास आहे. गेल्या दोन वर्षात पक्षाकडे अध्यक्ष नाही. अध्यक्षांशिवाय पक्षा पुढे कसा जाणार हे मला माहिती नाही. हे कोणाच्या विरोधात नसून पक्षाकडे पूर्णवेळ अध्यक्ष हवा. आमच्याकडे पार्ट-टाइम अध्यक्षही नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. इतका मोठा इतिहास असणारा कोणता राजकीय पक्ष अध्यक्षांविना पुढील वाटचाल करु शकणार आहे? आम्ही काँग्रेस पक्षासाठी लढत असून आमचा लढा सुरु ठेवू, असे सांगत आम्हाला काँग्रेसला मजबूत करायचे आहे. त्यासाठी काँग्रसने सर्वात आधी कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या इच्छा समजल्या पाहिजेत. देशातील लोकांना भाजप नको असून, आम्हाला त्यांना पर्याय द्यायचा आहे. असे कपिल सिब्बल यांनी यापूर्वी म्हटले होते. 

टॅग्स :Politicsराजकारणkapil sibalकपिल सिब्बलSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस