शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Jitin Prasada : "जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:56 IST

Jitin Prasada Joining BJP : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) भाजपामध्ये (BJP) सामील झाले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मागच्या वर्षी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र लिहून संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या 23 नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि भाजपचे खासदार अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांना बुधवारी भाजपाचे सदस्यत्व देण्यात आले. याच दरम्यान काँग्रेसचे नेते हरीश रावत (Harish Rawat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक" असल्याचं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांचा हा निर्णय न समजण्यासारख्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. "जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे हे म्हणजे आमच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक आहे. हे खूपच दु:खद आणि निराश करणारं आहे. त्यांनी काँग्रेसला स्थानिक पक्ष म्हटल्याने मला आश्चर्य वाटलं. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या पक्षाविरोधात संघर्ष केला त्यामध्येच त्यांनी प्रवेश केला हे गोंधळून टाकणारं आहे" असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. 

जितिन प्रसाद म्हणाले की, काँग्रेसमध्ये राहून जनतेच्या हिताचे रक्षण करणे शक्य नव्हते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कुशल आणि खंबीर नेतृत्वाची आणि भाजपसारख्या मोठ्या संघटनेची गरज आहे. भाजपच खऱ्या अर्थाने देशातील एकमेव राजकीय पक्ष होय. आजपासून माझ्या राजकीय जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर भाजपामध्ये सामील होणारे जितिन प्रसाद हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे नेते आहेत. जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद (शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश) यांचे पुत्र आहेत. 

जितिन प्रसाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली होती. जितिन प्रसाद हे 2004 मध्ये शाहजहाँपूर आणि 2009 मध्ये धौरहर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री व नंतर पोलाद, मार्ग परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री होते. 2011-12 पर्यंत पेट्रोलियम आणि 2012- 14 पर्यंत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारत