शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

अण्णा हजारेंनी केलेल्या त्या टीकेला जयंत पाटील यांनी दिलं अस उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 11:21 AM

Jayant Patil News : अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी टीका केली होती.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अण्णांच्या टीकेला उत्तर देण्याचे टाळलेअण्णांच्या टीकेवर काय बोलायचे असा सवाल केला व हसतच प्रश्नाला बगल दिली महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या बारा उमेदवाराची यादी मंजूर करतील

सावंतवाडी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकार वर केलेल्या टिकेवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर देण्याचे टाळत काय बोलायचे असा सवाल केला व हसतच प्रश्नाला बगल  दिली. मात्र यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या बारा उमेदवाराची यादी मंजूर करतील असा विश्वास ही व्यक्त केला.मंत्री जयंत पाटील हे रविवारी सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर आले असता रात्री उशिरा सावंतवाडीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,काका कुडाळकर,अबिद नाईक,पुंडलिक दळवी,रेवती राणे,प्रफुल्ल सुद्रिक आदि उपस्थित होते.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कोणताही अन्याय केलेला नाही,अशा प्रकारे कोणीही मंत्री कोणाचे नुकसान करत नाही.त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी कोण टीका करत असेल,तर आम्ही काय बोलणार,असा सवाल  मंत्री पाटील यांनी दीपक केसरकर यांचे नाव न घेता उपस्थित केला. दरम्यान सिंधुदुर्गातील अवैद्य धंदे रोखण्यासाठी दिवाळीनंतर एक्साईज आणि पोलीस खात्याच्या माध्यमातून जॉईंट ऑपरेशन राबविण्यात येईल.तर गरज असल्यास कायद्यात कठोरता आणली जाईल असे सांगितले.  आगामी काळात राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाणार आहे.येणाऱ्या सर्व पुढील निवडणुका एकत्र येवूनच लढवू,असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले.राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीला राज्यपाल मंजूरी देतील आता पर्यंत राज्यपालांनी कधीही अशी यादी नाकारली नसल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते अण्णा हजारे 

 महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली  होती. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला होता. एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधताना अण्णांनी ही टीका केली. लोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिली. पण मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही पत्राला उत्तर दिले नाही, असे अण्णा हजारेंनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलanna hazareअण्णा हजारेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस