शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"जयंत पाटील हे राजकारणात अनावधानानं आलेलं पात्र," गोपिचंद पडळकर यांची बोचरी टीका

By बाळकृष्ण परब | Updated: January 23, 2021 16:57 IST

Gopichand Padalkar : जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानाची चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आलेराजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ते राजकारणात आले

सांगली - मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानाबाबत चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे, अशी टीका गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानावर पडळकर यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ते राजकारणात आले. अनुकंपा तत्त्वावर आलेल्यांची गुणवत्ता तपासली जात नाही, असा टोला गोपिचंद पडळकर यांनी लगावला.यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसलाही गोपिचंद पडळकर यांनी टोले लगावले. जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाबाबत बोलले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळेल, असं वाटत नाही. खरंतर हा पक्षच भविष्यात राहील की नाही हा प्रश्न आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला.जयंत पाटील १९९० पासून राजकारणात आहेत. मात्र जिल्ह्यासाठी येईल ते मतदारसंघात न्यायचं याशिवाय वेगळं काही त्यांनी केलं नाही. इतक्या वर्षांच्या काळात केलेलं मोठं काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSangliसांगलीPoliticsराजकारण