शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

"जयंत पाटील हे राजकारणात अनावधानानं आलेलं पात्र," गोपिचंद पडळकर यांची बोचरी टीका

By बाळकृष्ण परब | Updated: January 23, 2021 16:57 IST

Gopichand Padalkar : जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानाची चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आलेराजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ते राजकारणात आले

सांगली - मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानाबाबत चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे, अशी टीका गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानावर पडळकर यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ते राजकारणात आले. अनुकंपा तत्त्वावर आलेल्यांची गुणवत्ता तपासली जात नाही, असा टोला गोपिचंद पडळकर यांनी लगावला.यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसलाही गोपिचंद पडळकर यांनी टोले लगावले. जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाबाबत बोलले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळेल, असं वाटत नाही. खरंतर हा पक्षच भविष्यात राहील की नाही हा प्रश्न आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला.जयंत पाटील १९९० पासून राजकारणात आहेत. मात्र जिल्ह्यासाठी येईल ते मतदारसंघात न्यायचं याशिवाय वेगळं काही त्यांनी केलं नाही. इतक्या वर्षांच्या काळात केलेलं मोठं काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSangliसांगलीPoliticsराजकारण