शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

"काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 14:56 IST

Jammu Kashmir Mehbooba Mufti And Narendra Modi : श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यालयात  पक्ष विशेष सदस्य मोहीमला सुरुवात करताना मेहबूबा मुफ्ती यांनी असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti ) यांनी केंद्र सरकारला काश्मीर मुद्द्यावर सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच दोन्ही देशांनी शस्त्र सोडून काश्मीरमध्ये शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. केंद्र सरकारने काश्मीर मुद्द्यावर तातडीने कुठलंही पाऊल उचललं नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल असं देखील मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यालयात  पक्ष विशेष सदस्य मोहीमला सुरुवात करताना मेहबूबा मुफ्ती यांनी असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. "काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी केल्याने भाजपाचा संताप का होतो? मग काय ही मागणी आम्ही पाकिस्तानकडे करावी का? स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीर हे भारतातला मिळाले नाही ना पाकिस्तानला" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

"भाजपाकडे संख्याबळ आहे. पण विरोध करणाऱ्यांना चिरडून टाकणार असा त्याचा अर्थ होत नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा चीनने नव्हता दिला. यामुळे काश्मीरची जनता गप्प बसणार नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख नागरिकांमध्ये संताप आहे" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार आपल्याविरोधात प्रकरणं शोधत आहे. जेणे करून आपल्याला त्रास देता येईल. यामुळे त्यांनी आपल्या आईला समन्स पाठवलं. पण आपण घाबरणार नाही. सरकारने हवं तर भावाला आणि मुलीला समन्स पाठवावं, असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?", यशवंत सिन्हांचा हल्लाबोल

यशवंत सिन्हा यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?" असं टीकास्त्र सोडलं आहे. सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत निशाणा साधला आहे. "बंगालच्या निवडणुका हरल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आपल्या पदाचा राजीनामा देणार का?" असा प्रश्न यशवंत सिन्हा यांनी विचारला आहे. तसेच "या निवडणुकीत ते स्वतः ज्याप्रकारे प्रचारात उतरलेत…त्यानंतरही जर पराभव झाला तर स्वाभिमान राखून त्यांनी किमान राजीनामा द्यायला हवा…पण प्रतिष्ठा नसलेल्या लोकांकडून मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय हे मला माहीत आहे" असं देखील यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारतPakistanपाकिस्तान