शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

...तर रिपाई ऐक्य शक्य; प्रा. जोगेंद्र कवाडेंनी घातली रामदास आठवले, प्रकाश आंबेडकरांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:14 IST

उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले त्यावेळी जोगेंद्र कवाडे बोलत होते.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण कार्यक्रमासाठी आलेले पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रिपाइं ऐक्य शक्य असून त्यासाठी मोठ्या मनाने रामदास आठवले यांना प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करावी लागेल. अशी प्रतिक्रिया दिली. आम्ही विना शर्त ऐक्यासाठी तयार असल्याचेही कवाडे यावेळी म्हणाले.

 उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण कार्यक्रमाचे उदघाटन रविवारी रात्री ८ वाजता पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई अशान, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदेव कवाडे, राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा पंचम कलानी, माजी नगरसेवक शांताराम निकम, प्रशांत धांडे यांच्यासह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते. यावेळी कवाडे यांनी रिपाइं ऐक्य शक्य असल्याचे सांगून त्यासाठी रामदास आठवले यांना वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांची मोठया मनाने व अहंकार बाजूला ठेवून मनधरणी करावी लागेल. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विना अट व शर्त आम्ही ऐक्यासाठी तयार असल्याचे कवाडे म्हणाले. 

शहरातील अवैध व धोकादायक बांधकामे नियमित करण्याचा राज्य समिती अहवाल सरकारने लवकर घोषित करून लाखो नागरिकांना दिलासा द्यावा. असे कवाडे यांनी सुचविले. तर दर पाच मिनिटांनी रंग बदलणाऱ्या वालधुनी नदीचा पुनर्विकास, डम्पिंग प्रश्न निकाली काढणे, महापालिकेतील अनुकंपातत्त्वावरील भरती, पदोन्नतीचा प्रश्न, दलितवस्ती निधीतील कामांना हिरवा कंदील आदी अनेक विकास कामाबाबत कवाडे यांनी प्रथमच उहापोह केला. कार्यक्रम वेळी दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची व चौकाचे नूतनीकरण व सौन्दर्यकरण करून दुरावस्था दूर केल्याची माहिती यावेळी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांनी दिली. तर बालाजी किणीकर यांनी महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत कायम राहून विकास कामे सोबत करू. असे आश्वासन कवाडे यांना दिले.

कवाडे यांचा निवडणूकीत स्वबळाचा नारा 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून आम्ही आघाडीचा घटक पक्ष आहो. मात्र येणाऱ्या जिल्हापरिषद व महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने पक्षाला सन्मानजनक जागा सोडल्या नाहीतर, पक्ष राज्यात स्वबळावर निवडणुका लढणार. असे स्पष्ट संकेत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे