शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

...तर रिपाई ऐक्य शक्य; प्रा. जोगेंद्र कवाडेंनी घातली रामदास आठवले, प्रकाश आंबेडकरांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:14 IST

उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले त्यावेळी जोगेंद्र कवाडे बोलत होते.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण कार्यक्रमासाठी आलेले पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रिपाइं ऐक्य शक्य असून त्यासाठी मोठ्या मनाने रामदास आठवले यांना प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करावी लागेल. अशी प्रतिक्रिया दिली. आम्ही विना शर्त ऐक्यासाठी तयार असल्याचेही कवाडे यावेळी म्हणाले.

 उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण कार्यक्रमाचे उदघाटन रविवारी रात्री ८ वाजता पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई अशान, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदेव कवाडे, राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा पंचम कलानी, माजी नगरसेवक शांताराम निकम, प्रशांत धांडे यांच्यासह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते. यावेळी कवाडे यांनी रिपाइं ऐक्य शक्य असल्याचे सांगून त्यासाठी रामदास आठवले यांना वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांची मोठया मनाने व अहंकार बाजूला ठेवून मनधरणी करावी लागेल. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विना अट व शर्त आम्ही ऐक्यासाठी तयार असल्याचे कवाडे म्हणाले. 

शहरातील अवैध व धोकादायक बांधकामे नियमित करण्याचा राज्य समिती अहवाल सरकारने लवकर घोषित करून लाखो नागरिकांना दिलासा द्यावा. असे कवाडे यांनी सुचविले. तर दर पाच मिनिटांनी रंग बदलणाऱ्या वालधुनी नदीचा पुनर्विकास, डम्पिंग प्रश्न निकाली काढणे, महापालिकेतील अनुकंपातत्त्वावरील भरती, पदोन्नतीचा प्रश्न, दलितवस्ती निधीतील कामांना हिरवा कंदील आदी अनेक विकास कामाबाबत कवाडे यांनी प्रथमच उहापोह केला. कार्यक्रम वेळी दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची व चौकाचे नूतनीकरण व सौन्दर्यकरण करून दुरावस्था दूर केल्याची माहिती यावेळी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांनी दिली. तर बालाजी किणीकर यांनी महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत कायम राहून विकास कामे सोबत करू. असे आश्वासन कवाडे यांना दिले.

कवाडे यांचा निवडणूकीत स्वबळाचा नारा 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून आम्ही आघाडीचा घटक पक्ष आहो. मात्र येणाऱ्या जिल्हापरिषद व महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने पक्षाला सन्मानजनक जागा सोडल्या नाहीतर, पक्ष राज्यात स्वबळावर निवडणुका लढणार. असे स्पष्ट संकेत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे