शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं", शरद पवारांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 15:01 IST

Sharad Pawar : नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे, त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील शेतकरी आंदोलनावरूनही शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

पुणे : अमित शहा यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे आणि चांगले सरकार यावे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. यावर नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे, त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

बारामती येथे एका कार्यक्रमानंतर शरद पवार हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी "नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही", असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

याचबरोबर, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरूनही शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे. शेतकऱ्यांची अस्वस्था पाहून केंद्र सरकार मधील वरिष्ठ मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालयला हवे होते. मात्र शेतकऱ्यांशी चर्चा करणारे रेल्वे मंत्री पीयूष गोयल काही कृषि तज्ज्ञ नाहीत. गोयल माझे चांगले मित्र आहेत. मात्र ते शेतीतज्ज्ञ आहेत, हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली, अशी कोपरखळी शरद पवार यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना मारली.

("भाजपाचा दुटप्पीपणा वेळ काढून अवश्य वाचा...", रोहित पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका )

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. नारायण राणे यांच्या पडवे मेडिकल कॉलेजचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित आहेत. तसेच, यावेळीअमित शहा यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?अमित शहा महाराष्ट्रात, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार महाराष्ट्रात यावे, अशी इच्छा नारायण राणे यांनी काल व्यक्त केली होती. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarayan Raneनारायण राणे PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शहा