शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

जागा वाटपावर अडले युतीचे घोडे, सेनेला हवे पालघर; भाजपाने मारली मेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:40 IST

भाजपा-शिवसेनेची युती होणार की नाही, हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून दोन्ही पक्षांनी एकमेकांना अल्टिमेटम दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.

मुंबई : भाजपा-शिवसेनेची युती होणार की नाही, हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून दोन्ही पक्षांनी एकमेकांना अल्टिमेटम दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. विधानसभेच्या प्रत्येकी १४४ जागा दोन्ही पक्षांनी लढवाव्यात, असा भाजपाचा प्रस्ताव आहे, तर शिवसेनेला पालघर लोकसभेची जागा हवी असून त्या बदल्यात सातारा भाजपाने घ्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.सोमवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव यांनी निर्वाणीची भाषा करत भाजपाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला. तर जालना येथे झालेल्या भाजपा कार्य समितीच्या बैठकीत भाजपानेही स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली. युतीसाठी आम्ही लाचार होणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला इशारा दिला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या २८८ जागांपैकी प्रत्येकी १४४ जागा भाजपा-शिवसेनेने लढाव्यात, असा भाजपाचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रस्तावात भाजपाने एक मेख घातल्याने तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांमधून युतीच्या मित्रपक्षांना (रिपाइं, रासपा आदी) जागा द्याव्यात, अशी ती अट टाकली असल्याचे समजते. तर शिवसेनेला लोकसभेच्या काही जागांची अदलाबदल करून हवी आहे. पालघर आणि भिवंडीसाठी शिवसेना आग्रही आहे; पण त्यावर तुटेपर्यंत ताणायचे नाही, असे धोरण आहे. लोकसभा, विधानसभेच्या जागावाटप एकाचवेळी जाहीर करावे, असा सेनेचा आग्रह आहे.मोठा भाऊ आम्हीच- खा. राऊतभाजपा-शिवसेनेत युतीसाठी चर्चा सुरू असताना शिवसेनेने मात्र त्याचा इन्कार केला. खासदारांच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते खा.संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे व राहणार. दिल्लीचे तख्त हा मोठा भाऊ गदागदा हलविणार. भाजपाकडून युतीचा कोणताही प्रस्ताव नाही. सगळ्या अफवा आहेत. देशभरात ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्वांचाच आयकर माफ करावा, असा ठराव बैठकीत मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.फाजील आत्मविश्वास बाळगू नका - अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांनी फाजील आत्मविश्वास बाळगू नये. जनमताचा कौल कोणाकडे आहे आणि आमच्या जनसंघर्ष यात्रेचा नेमका किती परिणाम झाला, हे मतदानानंतर समजेलच. जनतेत असलेली नाराजी मुख्यमंत्र्यांना लवकरच कळेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा