शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

"मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावं"; आरोग्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 14:46 IST

Dr Harsh Vardhan Slams Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जोरदार प्रत्यत्तर दिलं आहे. 

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत होती. परंतु आता कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वैद्यकीय सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जीव गमावावा लागत आहे. य़ाच दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जोरदार प्रत्यत्तर दिलं आहे. 

हर्षवर्धन यांनी राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर अधिक विश्वास आहे असं म्हटलं आहे. तसेच "मृतांच्या नावाने राजकारण करणं काँग्रेसच्या या गिधाडांकडून शिकावं" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधींनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "मृतांच्या नावाने राजकारण करणं ही काँग्रेसची स्टाईल आहे. झाडांवरील गिधाडं सध्या दिसेनासी झाली असली तर त्यांच्यातील ऊर्जा जमिनीवरील गिधाडांमध्ये आल्यासारखं वाटत आहे. राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर जास्त विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावं" असं ट्विट हर्षवर्धन यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोटं बोलत नाहीत पण भारत सरकार बोलतं असं म्हटलं होतं. या वृत्तपत्राने भारत सरकार सांगत असलेले कोरोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता. त्यावर आता हर्षवर्धन यांनी जोरदार उत्तर देत टोला लगावला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून "जबाबदार कोण?" असं म्हणत काही प्रश्न विचारले आहेत. "आता लसीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लसीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत" अशी परिस्थिती असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. 

"जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात

"आज, भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 11% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ 3 % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण 83% घटले. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लसीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. तसेच "कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लसीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तेसच लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे" असं देखील प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीdelhiदिल्लीDeathमृत्यू