शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:01 IST

Harshvardhan Patil Jayant Patil: हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकी आधीच हर्षवर्धन पाटलांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. 

Maharashtra Vidhan Sabha: समरजीत सिंह घाटगेंपाठोपाठ इंदापुरातील बडे प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. सोमवारी (७ ऑक्टोबर) त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी हर्षवर्धना पाटलांना लोकसभा निवडणुकीआधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते, असा राजकीय गौप्यस्फोट केला.  

जयंत पाटलांनी हर्षवर्धन पाटलांना केलेला फोन, काय झालं होतं बोलणं?

"२०१९ मध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपामध्ये त्यावेळच्या काही प्रश्नांमुळे गेले. पण, हर्षवर्धन भाऊ तुमचं स्वागत करताना मी असं म्हटलं तर काही वावगं नाही की, तुम्ही स्वगृही येत आहात. कारण मूळ घर तुमचं हेच होतं. तुम्ही यापूर्वीच यायला पाहिजं होतं, पण आमच्या घरात गर्दी होती. तुम्हाला येता आलं नाही. आज तुम्ही येत आहात, याचा आम्हाला आनंद आहे", असे जयंत पाटील म्हणाले. 

"अनेक ठिकाणी लोक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत. गेले अनेक दिवस मला वाटतं होतं की, हर्षवर्धन पाटलांनी देखील हा मार्ग अनुसरावा. त्यांच्याशी संपर्क केला, लोकसभेच्या आधीपासून; आत्ता नाही. लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला. मी त्यांना (हर्षवर्धन पाटील) म्हटलं की बघा. काही जमलं तर आपल्याला... आम्हाला लोकसभा महत्त्वाची आहे. त्यांनी  (हर्षवर्धन पाटील) मला सांगितलं की, जे शक्य आहे, ते आम्ही करतो, पण तूर्त इकडंच आहोत", असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी इंदापुरात बोलताना केला.  

"हर्षवर्धन पाटलांना मधून मधून फोन करायचो"

"मधून मधून मी फोन करायचो. शेवटी फोनवर ते बोलत नसल्याने मी बावड्याला जाऊन एक सभा घेतली. तिथे भाषण केलं की, ज्यांना (अजित पवार) टाळून तुम्ही (हर्षवर्धन पाटील) तिकडे गेलात, तेच तुमच्याबरोबर तिकडे बसलेले आहेत. त्यामुळे सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायचा विचार करा", असे जयंत पाटील भाषण करताना म्हणाले.     

'दिल्लीश्वर पवारांना नमवण्याचे प्रयत्न करताहेत'

"मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर शरद पवारांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाला. २०१९ च्या निवडणुकीआधी शरद पवारांना ईडीची नोटीसही आली. पवारांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल, अशी भावना या लोकांची होती. हा महाराष्ट्र मोडण्याचं काम काही लोक दहा वर्षांपासून दिल्लीत बसून करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं आज पुन्हा शरद पवारांच्या मागे उभी राहिली आहेत", अशी टीका जयंत पाटलांनी भाजपावर केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलindapur-acइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस