शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:01 IST

Harshvardhan Patil Jayant Patil: हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकी आधीच हर्षवर्धन पाटलांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. 

Maharashtra Vidhan Sabha: समरजीत सिंह घाटगेंपाठोपाठ इंदापुरातील बडे प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. सोमवारी (७ ऑक्टोबर) त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी हर्षवर्धना पाटलांना लोकसभा निवडणुकीआधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते, असा राजकीय गौप्यस्फोट केला.  

जयंत पाटलांनी हर्षवर्धन पाटलांना केलेला फोन, काय झालं होतं बोलणं?

"२०१९ मध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपामध्ये त्यावेळच्या काही प्रश्नांमुळे गेले. पण, हर्षवर्धन भाऊ तुमचं स्वागत करताना मी असं म्हटलं तर काही वावगं नाही की, तुम्ही स्वगृही येत आहात. कारण मूळ घर तुमचं हेच होतं. तुम्ही यापूर्वीच यायला पाहिजं होतं, पण आमच्या घरात गर्दी होती. तुम्हाला येता आलं नाही. आज तुम्ही येत आहात, याचा आम्हाला आनंद आहे", असे जयंत पाटील म्हणाले. 

"अनेक ठिकाणी लोक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत. गेले अनेक दिवस मला वाटतं होतं की, हर्षवर्धन पाटलांनी देखील हा मार्ग अनुसरावा. त्यांच्याशी संपर्क केला, लोकसभेच्या आधीपासून; आत्ता नाही. लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला. मी त्यांना (हर्षवर्धन पाटील) म्हटलं की बघा. काही जमलं तर आपल्याला... आम्हाला लोकसभा महत्त्वाची आहे. त्यांनी  (हर्षवर्धन पाटील) मला सांगितलं की, जे शक्य आहे, ते आम्ही करतो, पण तूर्त इकडंच आहोत", असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी इंदापुरात बोलताना केला.  

"हर्षवर्धन पाटलांना मधून मधून फोन करायचो"

"मधून मधून मी फोन करायचो. शेवटी फोनवर ते बोलत नसल्याने मी बावड्याला जाऊन एक सभा घेतली. तिथे भाषण केलं की, ज्यांना (अजित पवार) टाळून तुम्ही (हर्षवर्धन पाटील) तिकडे गेलात, तेच तुमच्याबरोबर तिकडे बसलेले आहेत. त्यामुळे सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायचा विचार करा", असे जयंत पाटील भाषण करताना म्हणाले.     

'दिल्लीश्वर पवारांना नमवण्याचे प्रयत्न करताहेत'

"मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर शरद पवारांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाला. २०१९ च्या निवडणुकीआधी शरद पवारांना ईडीची नोटीसही आली. पवारांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल, अशी भावना या लोकांची होती. हा महाराष्ट्र मोडण्याचं काम काही लोक दहा वर्षांपासून दिल्लीत बसून करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं आज पुन्हा शरद पवारांच्या मागे उभी राहिली आहेत", अशी टीका जयंत पाटलांनी भाजपावर केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलindapur-acइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस