शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अखिलेख यादव म्हणाले, "योगी आदित्यनाथ युपीचे रहिवासी नाही; दुसऱ्या प्रदेशातले, परंतु..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 12:03 IST

Akhilesh Yadav on Yogi Adityanath : पुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होणार, भाजपमुळे जनता त्रस्त, अखिलेख यादव याचं वक्तव्य

ठळक मुद्देपुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होणार, भाजपमुळे जनता त्रस्त, अखिलेख यादव याचं वक्तव्यतीन कृषी कायदे उद्योग घराण्यांच्या वर्चस्वासाठीच. अखिलेश यादव यांचा आरोप

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे रहिवासी नसून ते दुसऱ्या प्रदेशातून आले आहेत. परंतु येथील लोकांनी त्यांना स्वीकार केलं. यासाठी त्यांनी लोकांचे आभार व्यक्त केले पाहिजे, असं ते म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते दुसऱ्या प्रदेशातील आहेत हे सांगण्यामागील कारण काय याबाबत मात्र त्यांनी भाष्य केलं नाही. उत्तर प्रदेशातील जनता भाजप सरकारमुळे त्रस्त असून पुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होईल, असा विश्वासही अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. "मुख्यमंत्री हे उत्तर प्रदेशचे रहिवासी नाहीत. ते दुसऱ्या प्रदेशातून या ठिकाणी आले आहेत. येथील लोकांनी त्यांना स्वीकार केलं. यासाठी त्यांनी लोकांचे आभार व्यक्त केले पाहिजेत. अन्नदात्यांचा आनंद दलालांच्या पचनी पडत नाही, या योगींच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. तसंच इतकं मोठं खोटं सदनात कोणी कसं बोलू शकतं? असा सवालही त्यांनी केला.

खोटा दावा केला गोरखपुर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, संतकबीर नगर, बस्ती, गोंडा आणि फैजाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सरकारनं एमएसपी दिलं आहे का? त्यांना धान्याची किंमत काय दिली आहे असा प्रश्नही अखिलेख यादव यांनी केला. ऊस शेतकऱ्यांना सर्वाधिक देणी ही भाजप सरकारनं दिली असा खोटा दावा या सरकारनं केला. या सराकारनं अर्थव्यस्था खराब केली. लोकांच्या नोकऱ्याही गेल्या. कृषी क्षेत्रावरही काही उद्योग घराण्यांचं वर्चस्व प्रस्थापित होईल यासाठीच हे तीन कृषी कायदे आणल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी