शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'तो' निर्णय चूकच होता, पण पश्चाताप नाही; पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 19:38 IST

Devendra Fadnavis : पुरेसं संख्याबळ नसल्यानं चार दिवसांत पडलं होतं सरकार. राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायला नको होतं, फडणवीस यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देपुरेसं संख्याबळ नसल्यानं चार दिवसांत पडलं होतं सरकार.राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायला नको होतं, फडणवीस यांचं वक्तव्य.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पाहाटेचा शपथविधी सोहळ्याची अद्यापही चर्चा होताना दिसते. दरम्यान, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं हा चुकीचा निर्ण होताय राष्ट्रवादी काँग्रेससोहच सरकार स्थापन करायला नको होतं. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतीमेला तडा गेला असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एका वेबिनारमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं. "आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केलं. परंतु ते चुकीचं होतं आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. त्यांच्यात माझी जी प्रतीमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला," असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. योग आणि इश्वरावर विश्वास "उद्धव ठाकरे यांनी पहिली मुलाखत देताना आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नरेंद्र मोदी हे राजकारणात फारसे उतरत नसले तरी अमित शाह हे त्यांच्या २४*७ चर्चेत होते. योग आणि इश्वरावर माझा विश्वास आहे. कधी योग असाही असतो की आपण खुप प्रयत्न करतो. परंतु फासे नीट पडले नाहीत आणि सरकार गेलं," असं त्यांनी नमूद केलं. माझं राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं जेवढं चुकीचं होतं तेवढंच हे सरकारही अनैतिक असल्याचं ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी