शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

‘या’ राज्यात भाजपा सरकार कोसळणार?; काँग्रेस विधानसभेत अविश्वास ठराव मांडणार

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 14:38 IST

Due to Farmers Protest Fear of collapse BJP government as Congress prepares to bring no-confidence motion in Haryana: एकीकडे शेतकरी आंदोलन तर दुसरीकडे काँग्रेस खट्टर सरकारविरोधात विधानसभा अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे

ठळक मुद्देहरियाणात ५ मार्चपासून विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, तत्पूर्वी विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे,राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर खट्टर सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणेलप्रस्ताव स्वीकारावा की नाकारावा हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे

नवी दिल्ली – कृषी कायद्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष भाजपाशासित राज्यांसाठी डोकेदुखी बनली आहे, शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम पंजाब-हरियाणा येथे पाहायला मिळाला, त्यामुळे आता हरियाणात मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा-जेजेपी आघाडी सरकारवर दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. (Fear of BJP government collapsing in Haryana due to Congress prepares to bring no-confidence motion in VidhanSabha)

एकीकडे शेतकरी आंदोलन तर दुसरीकडे काँग्रेस खट्टर सरकारविरोधात विधानसभा अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे खट्टर सरकार हा अविश्वास प्रस्ताव कसा जिंकणार हे पाहणं गरजेचं आहे, हरियाणात ५ मार्चपासून विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, तत्पूर्वी विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे, विधानसभेत विरोधी पक्षनेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या अध्यक्षतेत काँग्रेस आमदारांची बैठक झाली, यात अनेक मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची चर्चा झाली. (Farmers Protest)

हुड्डा यांनी बैठकीनंतर सांगितले की, राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर खट्टर सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणेल, त्याचसोबत कृषी कायद्यात दुरुस्ती करून त्यात शेतकऱ्यांसाठी हमीभावाची गॅरंटी असणारी तरतूद आणणारं खासगी विधेयक या अधिवेशनात मांडलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष अविश्वास ठराव स्वीकारणार?

विधानसभा सभागृहात सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे ३१ आमदार आहेत, आणि १८ आमदारांच्या संख्येवर अविश्वास ठराव सभागृहात मांडलं जाऊ शकतं, मात्र हा प्रस्ताव स्वीकारावा की नाकारावा हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे, काँग्रेस आमदारांनी आणलेला अविश्वास ठराव अध्यक्षांनी स्वीकारला तर १० दिवसात या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करावी लागेल, त्यामुळे खट्टर सरकार विरोधकांनी अविश्वास ठराव आणू नये यासाठी प्रयत्नशील आहे, कारण शेतकरी मुद्द्यावर जेजेपी आणि अपक्ष आमदारांनी याआधीच भाजपाला विरोध दर्शवला आहे.

हरियाणात जेजेपीच्या समर्थनाने भाजपाचं सरकार

हरियाणात भाजपा-जेजेपी आघाडीचं सरकार आहे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ४० जागांवर विजयी झाली होती, त्यानंतर जेजेपीच्या १० आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला, याशिवाय अपक्ष ७ आमदार भाजपासोबत आले, याठिकाणी काँग्रेसचे ३१ आमदार आहेत, तसेच एक आमदार लोकहित पार्टीचा आहे, त्यातच शेतकऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे जेजेपीचे १० आमदार भाजपावर नाराज आहेत, अशावेळी जर काही गडबड झाली तर हरियाणात भाजपा सरकार कोसळण्याची शक्यता अधिक आहे

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाcongressकाँग्रेस