शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

‘या’ राज्यात भाजपा सरकार कोसळणार?; काँग्रेस विधानसभेत अविश्वास ठराव मांडणार

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 14:38 IST

Due to Farmers Protest Fear of collapse BJP government as Congress prepares to bring no-confidence motion in Haryana: एकीकडे शेतकरी आंदोलन तर दुसरीकडे काँग्रेस खट्टर सरकारविरोधात विधानसभा अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे

ठळक मुद्देहरियाणात ५ मार्चपासून विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, तत्पूर्वी विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे,राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर खट्टर सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणेलप्रस्ताव स्वीकारावा की नाकारावा हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे

नवी दिल्ली – कृषी कायद्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष भाजपाशासित राज्यांसाठी डोकेदुखी बनली आहे, शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम पंजाब-हरियाणा येथे पाहायला मिळाला, त्यामुळे आता हरियाणात मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा-जेजेपी आघाडी सरकारवर दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. (Fear of BJP government collapsing in Haryana due to Congress prepares to bring no-confidence motion in VidhanSabha)

एकीकडे शेतकरी आंदोलन तर दुसरीकडे काँग्रेस खट्टर सरकारविरोधात विधानसभा अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे खट्टर सरकार हा अविश्वास प्रस्ताव कसा जिंकणार हे पाहणं गरजेचं आहे, हरियाणात ५ मार्चपासून विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, तत्पूर्वी विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे, विधानसभेत विरोधी पक्षनेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या अध्यक्षतेत काँग्रेस आमदारांची बैठक झाली, यात अनेक मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची चर्चा झाली. (Farmers Protest)

हुड्डा यांनी बैठकीनंतर सांगितले की, राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर खट्टर सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणेल, त्याचसोबत कृषी कायद्यात दुरुस्ती करून त्यात शेतकऱ्यांसाठी हमीभावाची गॅरंटी असणारी तरतूद आणणारं खासगी विधेयक या अधिवेशनात मांडलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष अविश्वास ठराव स्वीकारणार?

विधानसभा सभागृहात सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे ३१ आमदार आहेत, आणि १८ आमदारांच्या संख्येवर अविश्वास ठराव सभागृहात मांडलं जाऊ शकतं, मात्र हा प्रस्ताव स्वीकारावा की नाकारावा हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे, काँग्रेस आमदारांनी आणलेला अविश्वास ठराव अध्यक्षांनी स्वीकारला तर १० दिवसात या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करावी लागेल, त्यामुळे खट्टर सरकार विरोधकांनी अविश्वास ठराव आणू नये यासाठी प्रयत्नशील आहे, कारण शेतकरी मुद्द्यावर जेजेपी आणि अपक्ष आमदारांनी याआधीच भाजपाला विरोध दर्शवला आहे.

हरियाणात जेजेपीच्या समर्थनाने भाजपाचं सरकार

हरियाणात भाजपा-जेजेपी आघाडीचं सरकार आहे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ४० जागांवर विजयी झाली होती, त्यानंतर जेजेपीच्या १० आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला, याशिवाय अपक्ष ७ आमदार भाजपासोबत आले, याठिकाणी काँग्रेसचे ३१ आमदार आहेत, तसेच एक आमदार लोकहित पार्टीचा आहे, त्यातच शेतकऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे जेजेपीचे १० आमदार भाजपावर नाराज आहेत, अशावेळी जर काही गडबड झाली तर हरियाणात भाजपा सरकार कोसळण्याची शक्यता अधिक आहे

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाcongressकाँग्रेस