शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

‘या’ राज्यात भाजपा सरकार कोसळणार?; काँग्रेस विधानसभेत अविश्वास ठराव मांडणार

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 14:38 IST

Due to Farmers Protest Fear of collapse BJP government as Congress prepares to bring no-confidence motion in Haryana: एकीकडे शेतकरी आंदोलन तर दुसरीकडे काँग्रेस खट्टर सरकारविरोधात विधानसभा अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे

ठळक मुद्देहरियाणात ५ मार्चपासून विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, तत्पूर्वी विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे,राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर खट्टर सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणेलप्रस्ताव स्वीकारावा की नाकारावा हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे

नवी दिल्ली – कृषी कायद्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष भाजपाशासित राज्यांसाठी डोकेदुखी बनली आहे, शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम पंजाब-हरियाणा येथे पाहायला मिळाला, त्यामुळे आता हरियाणात मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा-जेजेपी आघाडी सरकारवर दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. (Fear of BJP government collapsing in Haryana due to Congress prepares to bring no-confidence motion in VidhanSabha)

एकीकडे शेतकरी आंदोलन तर दुसरीकडे काँग्रेस खट्टर सरकारविरोधात विधानसभा अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे खट्टर सरकार हा अविश्वास प्रस्ताव कसा जिंकणार हे पाहणं गरजेचं आहे, हरियाणात ५ मार्चपासून विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, तत्पूर्वी विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे, विधानसभेत विरोधी पक्षनेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या अध्यक्षतेत काँग्रेस आमदारांची बैठक झाली, यात अनेक मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची चर्चा झाली. (Farmers Protest)

हुड्डा यांनी बैठकीनंतर सांगितले की, राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर खट्टर सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणेल, त्याचसोबत कृषी कायद्यात दुरुस्ती करून त्यात शेतकऱ्यांसाठी हमीभावाची गॅरंटी असणारी तरतूद आणणारं खासगी विधेयक या अधिवेशनात मांडलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष अविश्वास ठराव स्वीकारणार?

विधानसभा सभागृहात सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे ३१ आमदार आहेत, आणि १८ आमदारांच्या संख्येवर अविश्वास ठराव सभागृहात मांडलं जाऊ शकतं, मात्र हा प्रस्ताव स्वीकारावा की नाकारावा हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे, काँग्रेस आमदारांनी आणलेला अविश्वास ठराव अध्यक्षांनी स्वीकारला तर १० दिवसात या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करावी लागेल, त्यामुळे खट्टर सरकार विरोधकांनी अविश्वास ठराव आणू नये यासाठी प्रयत्नशील आहे, कारण शेतकरी मुद्द्यावर जेजेपी आणि अपक्ष आमदारांनी याआधीच भाजपाला विरोध दर्शवला आहे.

हरियाणात जेजेपीच्या समर्थनाने भाजपाचं सरकार

हरियाणात भाजपा-जेजेपी आघाडीचं सरकार आहे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ४० जागांवर विजयी झाली होती, त्यानंतर जेजेपीच्या १० आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला, याशिवाय अपक्ष ७ आमदार भाजपासोबत आले, याठिकाणी काँग्रेसचे ३१ आमदार आहेत, तसेच एक आमदार लोकहित पार्टीचा आहे, त्यातच शेतकऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे जेजेपीचे १० आमदार भाजपावर नाराज आहेत, अशावेळी जर काही गडबड झाली तर हरियाणात भाजपा सरकार कोसळण्याची शक्यता अधिक आहे

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाcongressकाँग्रेस