शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Sanjay Raut: “हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा

By प्रविण मरगळे | Updated: November 14, 2020 12:41 IST

Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: लोकांना ब्लॉक करणे, ट्रोल करणे हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

ठळक मुद्देएका पक्षाने देश चालत नाही, ६० वर्षात अनेक पक्ष आले अन् गेले, देश देशच राहतोमोठमोठे नेते देशात आले, आज तुमच्याकडे सत्ता आहे, उद्या आमच्याकडे असेल, हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतोसुशांत राजपूत प्रकरणात ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं हे सांगितलं होतं का?

मुंबई - सुशांत सिंग राजूपतला बिहारचं मानत नाही, तो मुंबईचा आहे, मुंबईत येऊन सुशांतची ओळख निर्माण झाली, सुशांत आमचा मुलगा आहे, त्याच्यासोबत चुकीचं झालं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ, किंचाळूच चुकीचं बोलणं खरं होत नाही. जे सत्य असते ते शांतपणेही त्याचं काम सुरु ठेवतं. जे सत्य आहे ते लपवून नवीन काही शोधायचं प्रयत्न सुरू होता असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

कुणाल कामरासोबत झालेल्या मुलाखतीत संजय राऊतांनी सुशांत राजपूत प्रकरणावर भाष्य केले. सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची तुम्हाला कोणाची ऑर्डर होती का? ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं हे सांगितलं होतं का? मुंबई पोलिसांनी जो तपास केला तो शतप्रतिशत खरा होता, जगातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचा समावेश आहे. वर्दीचा सन्मान राखला पाहिजे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणतात, त्यांच्याच सुरक्षेत फिरता, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतात, शरद पवारांविरोधात बोलतात, त्या व्यक्तींसोबत पोलिसांनी राहू नये हे आम्ही बोललो नाही. पोलीस त्यांचे काम करतात, त्या व्यक्तीची सुरक्षा करणे हे सरकारचं काम आहे असं राऊत म्हणाले.

“या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध"

त्याचसोबत लोकांना ब्लॉक करणे, ट्रोल करणे हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, देश खूप मोठा आहे, एका पक्षाने देश चालत नाही, ६० वर्षात अनेक पक्ष आले अन् गेले, देश देशच राहतो, जो नडणारा असतो, बिनधास्त बोलतो त्याचं नाव नेहमी राहतं. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलं नाही, मोठमोठे नेते देशात आले, आज तुमच्याकडे सत्ता आहे, उद्या आमच्याकडे असेल, हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशीचा ससेमिरा तुमच्यामागेही लागू शकतो, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

खासगी आयुष्य वैगेरे काहीच नाही...

खासगी आयुष्य वैगेरे काय नसतं, खूप लहान वयात मी सामनाचं काम सुरु केलं, २८ वर्षाचा असताना माझ्यावर सामना संपादकाची जबाबदारी आली, बाळासाहेब ठाकरेंसारख्या नेत्यासोबत काम करणं हे भाग्य होतं. ही फक्त मुंबईची लढाई नव्हती, तर देशाची लढाई होती, ज्याठिकाणी लोक राहतात त्याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य हवं ही बाळासाहेबांची भूमिका होती, देशावर संकट येतं तेव्हा सगळेजण एकत्र येतात. परंतु प्रत्येक राज्याची स्वत:ची संस्कृती आणि भाषा आहे. त्यावेळी शिवसेनेची मराठी माणसासाठी चळवळ सुरु केली. कित्येक लोक आंदोलनात मेली, विचारधारेसाठी मरण्यासही तयार आहे. संजय राऊत बॉम्ब आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ कोणी काम केले असेल तर त्यातील मी एक आहे असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपाMumbai policeमुंबई पोलीस