शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस सदस्याची सहज निवड - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 03:12 IST

Ashok Chavan : लोकमत’च्या संपादकीय मंडळासमवेत सोमवारी अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.

औरंगाबाद : नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदी तीनही पक्षांच्या समन्वयातून सर्वमान्य व्यक्तीची निवड केली जाईल. या पदावर काँग्रेसच्या सदस्याची निवड होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही, असे काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.‘लोकमत’च्या संपादकीय मंडळासमवेत आज, सोमवारी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. जागावाटपात ही जागा काँग्रेसकडेच होती आणि नव्या अध्यक्षांची निवड करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत महत्त्वाचा पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका आहे. यावर त्यांनी प्रकाश टाकला.समृद्धी महामार्ग जालन्याहून नांदेडात जोडण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यासाठी ९५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नांदेडहून ३ तासांत औरंगाबादेत पोहोचता येईल. निधीची उभारणी करताना सरकारी मालमत्तेतून होईल शिवाय खासगी-सार्वजनिक भागीदारी असे पर्याय वापरले जातील. मराठवाड्यातील लगतची शहरेही जोडता येतील. मराठवाड्याच्या पायाभूत सुविधांकडे फडणवीस सरकारने दुर्लक्ष केले, उपेक्षा केली याचे शल्य मनात आहे व केंद्राच्या अर्थसंकल्पात ३२८ प्रकल्प रस्त्यांचे आहेत, पण येथेही मराठवाड्याची उपेक्षाच झाली. हा दृष्टिकोन हैदराबाद-मनमाड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणातही दिसतो. ब्राॅडगेजसुद्धा संघर्ष करूनच मिळाले, याची आठवण त्यांनी करून दिली. शेंद्रा आणि बिडकीन या डीएमआयसी क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याचे काम झालेले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या रस्त्याची घोषणा केली होती, पण काम रेंगाळले. वनजमिनीचा प्रश्न, जमीन अधिग्रहणातील समस्यांमुळे मराठवाड्यातील रस्ते रेंगाळले.  अकार्यक्षम कंत्राटदारांमुळे मराठवाड्यातील १७ ते १८ रस्त्यांचे प्रकल्प रखडले आहेत. अनेक रस्त्यांचे अधिग्रहण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेले आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. नांदेडमध्ये खलिस्तान समर्थकाला अटक करण्यात आली. हा एक संवेदनशील प्रश्न असून परवाचे प्रकरण पोलिसांच्या सतर्कतेने लक्षात आले. पंजाबात गुन्हे करून इकडे गुन्हेगार येऊ शकतात आणि याबाबत पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणPoliticsराजकारण