शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस सदस्याची सहज निवड - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 03:12 IST

Ashok Chavan : लोकमत’च्या संपादकीय मंडळासमवेत सोमवारी अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.

औरंगाबाद : नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदी तीनही पक्षांच्या समन्वयातून सर्वमान्य व्यक्तीची निवड केली जाईल. या पदावर काँग्रेसच्या सदस्याची निवड होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही, असे काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.‘लोकमत’च्या संपादकीय मंडळासमवेत आज, सोमवारी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. जागावाटपात ही जागा काँग्रेसकडेच होती आणि नव्या अध्यक्षांची निवड करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत महत्त्वाचा पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका आहे. यावर त्यांनी प्रकाश टाकला.समृद्धी महामार्ग जालन्याहून नांदेडात जोडण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यासाठी ९५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नांदेडहून ३ तासांत औरंगाबादेत पोहोचता येईल. निधीची उभारणी करताना सरकारी मालमत्तेतून होईल शिवाय खासगी-सार्वजनिक भागीदारी असे पर्याय वापरले जातील. मराठवाड्यातील लगतची शहरेही जोडता येतील. मराठवाड्याच्या पायाभूत सुविधांकडे फडणवीस सरकारने दुर्लक्ष केले, उपेक्षा केली याचे शल्य मनात आहे व केंद्राच्या अर्थसंकल्पात ३२८ प्रकल्प रस्त्यांचे आहेत, पण येथेही मराठवाड्याची उपेक्षाच झाली. हा दृष्टिकोन हैदराबाद-मनमाड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणातही दिसतो. ब्राॅडगेजसुद्धा संघर्ष करूनच मिळाले, याची आठवण त्यांनी करून दिली. शेंद्रा आणि बिडकीन या डीएमआयसी क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याचे काम झालेले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या रस्त्याची घोषणा केली होती, पण काम रेंगाळले. वनजमिनीचा प्रश्न, जमीन अधिग्रहणातील समस्यांमुळे मराठवाड्यातील रस्ते रेंगाळले.  अकार्यक्षम कंत्राटदारांमुळे मराठवाड्यातील १७ ते १८ रस्त्यांचे प्रकल्प रखडले आहेत. अनेक रस्त्यांचे अधिग्रहण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेले आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. नांदेडमध्ये खलिस्तान समर्थकाला अटक करण्यात आली. हा एक संवेदनशील प्रश्न असून परवाचे प्रकरण पोलिसांच्या सतर्कतेने लक्षात आले. पंजाबात गुन्हे करून इकडे गुन्हेगार येऊ शकतात आणि याबाबत पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणPoliticsराजकारण