शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मुख्यमंत्रिपदी प्रमोशन मिळावं वाटतं का?; पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मिश्किल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:46 IST

ज्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यातलं राजकीय गणित बदललं. त्या मुख्यमंत्रिपदावर प्रमोशन व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी अजितदादांना विचारला.

ठळक मुद्देआमच्याकडे १४५ मध्ये एकच मुख्यमंत्री होतो, तो आम्ही बसवलेला आहे. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल, प्रमोशन होऊन मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का?महाविकास आघाडी स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन केली आहे.

नाशिक – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळालं. शिवसेना-भाजपा युतीत लढणारे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावरून वेगळे झाले. विधानसभा निवडणुका एकत्र लढणारे निकालानंतर वेगळे झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्रिपदावरून राज्यात राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक वर्ष एकमेकांविरोधात लढलेले कट्टर शत्रू एकत्र येत सत्ता स्थापन केली.

आता ज्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यातलं राजकीय गणित बदललं. त्या मुख्यमंत्रिपदावर प्रमोशन व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी उपमुख्यमंत्रीअजित पवार(Ajit Pawar) यांना विचारला होता. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता अजितदादांनी नाही वाटत असं उत्तर दिलं. उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ५ वर्ष तेच राहतील असं अजितदादांनी स्पष्ट सांगितले.

नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यात एका पत्रकाराने अजितदादांना वेगळाच प्रश्न विचारला. प्रत्येकाला बढती आणि प्रमोशनची अपेक्षा असते. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल, प्रमोशन होऊन मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न केला. त्यावरून अजित पवार म्हणाले की, मला प्रमोशन व्हावं असं वाटत नाही. तुम्हीही पत्रकार आहात, तुम्हालाही संपादक व्हावं वाटतं. पण सर्वजण संपादक होत नाहीत. एकच व्यक्ती संपादक असतो. आमच्याकडे १४५ मध्ये एकच मुख्यमंत्री होतो, तो आम्ही बसवलेला आहे. तोही ५ वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे ५ वर्ष तरी याचा विचार करायचा नाही असं मिश्किल उत्तर अजितदादांनी दिलं.  

हे नेते सांगतील तोपर्यंत सरकार चालणार

महाविकास आघाडी स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी बैठकीत निर्णय घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळतील असं ठरवलं आहे. जोपर्यंत हे नेते सांगतील तोपर्यंत हे सरकार चालणार आहे. शरद पवारांनी ५ वर्ष सरकार चालेल हे स्पष्ट सांगितले आहे. सोनिया गांधी यांचीही हे सरकार ५ वर्ष चालावं अशी इच्छा असल्याचं नाना पटोले, बाळासाहेब थोरात म्हणतात. त्यामुळे सरकारमध्ये काही आलबेल नाही अशा बातम्या मुद्दामाहून सोडल्या जातात. त्यात काही तथ्य नसतं असं अजित पवार म्हणाले आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस