शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदी प्रमोशन मिळावं वाटतं का?; पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मिश्किल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:46 IST

ज्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यातलं राजकीय गणित बदललं. त्या मुख्यमंत्रिपदावर प्रमोशन व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी अजितदादांना विचारला.

ठळक मुद्देआमच्याकडे १४५ मध्ये एकच मुख्यमंत्री होतो, तो आम्ही बसवलेला आहे. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल, प्रमोशन होऊन मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का?महाविकास आघाडी स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन केली आहे.

नाशिक – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळालं. शिवसेना-भाजपा युतीत लढणारे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावरून वेगळे झाले. विधानसभा निवडणुका एकत्र लढणारे निकालानंतर वेगळे झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्रिपदावरून राज्यात राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक वर्ष एकमेकांविरोधात लढलेले कट्टर शत्रू एकत्र येत सत्ता स्थापन केली.

आता ज्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यातलं राजकीय गणित बदललं. त्या मुख्यमंत्रिपदावर प्रमोशन व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी उपमुख्यमंत्रीअजित पवार(Ajit Pawar) यांना विचारला होता. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता अजितदादांनी नाही वाटत असं उत्तर दिलं. उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ५ वर्ष तेच राहतील असं अजितदादांनी स्पष्ट सांगितले.

नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यात एका पत्रकाराने अजितदादांना वेगळाच प्रश्न विचारला. प्रत्येकाला बढती आणि प्रमोशनची अपेक्षा असते. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल, प्रमोशन होऊन मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न केला. त्यावरून अजित पवार म्हणाले की, मला प्रमोशन व्हावं असं वाटत नाही. तुम्हीही पत्रकार आहात, तुम्हालाही संपादक व्हावं वाटतं. पण सर्वजण संपादक होत नाहीत. एकच व्यक्ती संपादक असतो. आमच्याकडे १४५ मध्ये एकच मुख्यमंत्री होतो, तो आम्ही बसवलेला आहे. तोही ५ वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे ५ वर्ष तरी याचा विचार करायचा नाही असं मिश्किल उत्तर अजितदादांनी दिलं.  

हे नेते सांगतील तोपर्यंत सरकार चालणार

महाविकास आघाडी स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी बैठकीत निर्णय घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळतील असं ठरवलं आहे. जोपर्यंत हे नेते सांगतील तोपर्यंत हे सरकार चालणार आहे. शरद पवारांनी ५ वर्ष सरकार चालेल हे स्पष्ट सांगितले आहे. सोनिया गांधी यांचीही हे सरकार ५ वर्ष चालावं अशी इच्छा असल्याचं नाना पटोले, बाळासाहेब थोरात म्हणतात. त्यामुळे सरकारमध्ये काही आलबेल नाही अशा बातम्या मुद्दामाहून सोडल्या जातात. त्यात काही तथ्य नसतं असं अजित पवार म्हणाले आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस