शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदी प्रमोशन मिळावं वाटतं का?; पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मिश्किल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:46 IST

ज्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यातलं राजकीय गणित बदललं. त्या मुख्यमंत्रिपदावर प्रमोशन व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी अजितदादांना विचारला.

ठळक मुद्देआमच्याकडे १४५ मध्ये एकच मुख्यमंत्री होतो, तो आम्ही बसवलेला आहे. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल, प्रमोशन होऊन मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का?महाविकास आघाडी स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन केली आहे.

नाशिक – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळालं. शिवसेना-भाजपा युतीत लढणारे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावरून वेगळे झाले. विधानसभा निवडणुका एकत्र लढणारे निकालानंतर वेगळे झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्रिपदावरून राज्यात राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक वर्ष एकमेकांविरोधात लढलेले कट्टर शत्रू एकत्र येत सत्ता स्थापन केली.

आता ज्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यातलं राजकीय गणित बदललं. त्या मुख्यमंत्रिपदावर प्रमोशन व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी उपमुख्यमंत्रीअजित पवार(Ajit Pawar) यांना विचारला होता. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता अजितदादांनी नाही वाटत असं उत्तर दिलं. उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ५ वर्ष तेच राहतील असं अजितदादांनी स्पष्ट सांगितले.

नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यात एका पत्रकाराने अजितदादांना वेगळाच प्रश्न विचारला. प्रत्येकाला बढती आणि प्रमोशनची अपेक्षा असते. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल, प्रमोशन होऊन मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न केला. त्यावरून अजित पवार म्हणाले की, मला प्रमोशन व्हावं असं वाटत नाही. तुम्हीही पत्रकार आहात, तुम्हालाही संपादक व्हावं वाटतं. पण सर्वजण संपादक होत नाहीत. एकच व्यक्ती संपादक असतो. आमच्याकडे १४५ मध्ये एकच मुख्यमंत्री होतो, तो आम्ही बसवलेला आहे. तोही ५ वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे ५ वर्ष तरी याचा विचार करायचा नाही असं मिश्किल उत्तर अजितदादांनी दिलं.  

हे नेते सांगतील तोपर्यंत सरकार चालणार

महाविकास आघाडी स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी बैठकीत निर्णय घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळतील असं ठरवलं आहे. जोपर्यंत हे नेते सांगतील तोपर्यंत हे सरकार चालणार आहे. शरद पवारांनी ५ वर्ष सरकार चालेल हे स्पष्ट सांगितले आहे. सोनिया गांधी यांचीही हे सरकार ५ वर्ष चालावं अशी इच्छा असल्याचं नाना पटोले, बाळासाहेब थोरात म्हणतात. त्यामुळे सरकारमध्ये काही आलबेल नाही अशा बातम्या मुद्दामाहून सोडल्या जातात. त्यात काही तथ्य नसतं असं अजित पवार म्हणाले आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस