शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

“हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 14:47 IST

देवेंद्र फडणवीस यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

मुंबई: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची असल्याची सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (devendra fadnavis says mns is not our enemy and react over bjp alliance)

मनसेसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मनसे शत्रूपक्ष नाही. पण, भाषेच्या संदर्भातील त्यांची भूमिका भाजपला मान्य नाही, असे सांगताना हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची आहे. अलीकडील काळात मनसेने तशी भूमिका घेतली आहे. मात्र, भाषेसंदर्भातील भूमिका मनसेने बदलली, तर विचार करता येऊ शकतो. पण, आताच्या घडीला मनसेसोबत युतीची कोणतीही चर्चा नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

“भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले

भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला आहे. यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळतो. मात्र, त्यासाठी अंगावर जाणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन योग्य नाही. या घटनेची दखल घेतली गेली पाहिजे. वर्षभरातील तीन मोठ्या घटनेमुळे कोकणवासीय उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी आता आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हवा. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुरावेळी जीआर बदलून मदत केली होती. तशीच मदत आता करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

“पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये”; नारायण राणेंवर काँग्रेसचे टीकास्त्र

दरम्यान, सोलापूरमधून मराठवाड्याला पाणी कस नेता येईल याबाबत वर्ल्ड बँक सोबत बैठकीत प्रस्ताव होता. त्यावर सरकारने विचार करायला हवा. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा अजूनही पाण्याखाली असल्याचे समजले. आलमट्टी धरणातून ५ ते ६ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होते, असे फडणवीस म्हणाले. दुसरीकडे साखर कारखाने जगले पाहिजेत. ज्यांनी बुडवले त्यांना मदत द्यायची आणि बुडवणाऱ्यांना संधी का द्यायची, अशी विचारणा करत हे योग्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसे