शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
5
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
17
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
18
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
19
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भीषण दुष्काळ असतानाही निवडणुकीत शेतकरी दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:22 IST

निवडणूक आहे म्हणून नव्हे; तर शेतकरी हा कायमच दुर्लक्षित असतो. त्याच्याकडे पुरेसे लक्ष द्यायला सरकारला वेळ नसतो.

- अमर हबीबनिवडणूक आहे म्हणून नव्हे; तर शेतकरी हा कायमच दुर्लक्षित असतो. त्याच्याकडे पुरेसे लक्ष द्यायला सरकारला वेळ नसतो. सध्याचा दुष्काळ भीषण आहे. लाखोंच्या प्रचाससभांमध्ये कुठल्याही पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडात दुष्काळाचा विषय निघाला का? दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा ऐकायला आली का?घरामध्ये आई, बहीण, पत्नी यांच्याकडे जसे बघितले जाते, तसेच शेतकऱ्यांकडे बघितले जाते. कुटुंबात स्त्रियांची उपेक्षा, तशीच समाजात शेतकऱ्यांची उपेक्षा कायम आहे. निवडणुकीत या बाबींकडे दुर्लक्ष होणे याचे मला आश्चर्य वाटत नाही.सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. पिण्याचे हंडाभर पाणी मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला विशेषत: महिलांना मैलोन्मैल भटकावे लागत आहे. चारापाण्याची व्यवस्था नसल्याने जनावरे जगविण्यासाठी छावण्यांमध्ये आणली आहेत. जनावरांबरोबर आश्रयाला राहणाºया शेतकºयांचेही तेथे हाल होत आहेत. हाताला काम मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांचे मुंबई, पुण्याकडे मोठ्या संख्येने स्थलांतर होऊ लागले आहे. कपाशी, सोयाबीन यांचे भाव या वर्षी कमी आले. त्यामुळेच शेतकºयांच्या हातात पैसा राहिला नाही. परिणामी, शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नवीन अभ्यासानुसार देशात दररोज ४३ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. खरे तर त्यांना आत्महत्या म्हणणे चूक आहे. मरणारे सर्व शेतकरी सरकारच्या धोरणाचे बळी आहेत. या आत्महत्या नसून खून आहेत व त्याला थेट सरकार जबाबदार आहे. कायदे लोककल्याणासाठी बनविले जातात, मग ते शेतकरी विरोधी कसे? या कायद्यांच्या बेड्यांमध्ये जखडल्यामुळेच शेतकरी मरण पत्करतात.इतकी भीषण परिस्थिती असतानाही निवडणुकीमध्ये शेतकºयांचा विषय केंद्रस्थानी आला नाही. मला वाटते शेतकºयांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम असला पाहिजे. विविध पक्षांचे प्रकाशित झालेले जाहिरनामे पाहिले, तर त्याच भिकेची बरसात दिसते, पण या राष्ट्रीय मुद्द्यांना अजिबात स्पर्श केला गेलेला नाही.परंपरागत पद्धतीने शेतकºयांचे प्रश्न सोडविणे चुकीचे आहे. कारण त्यातून प्रश्न न सुटता दलालांचे कल्याण होत असते. रोजगार हमी योजना, चारा छावणी, हे दलालांचे कल्याण करणारे कार्यक्रम आहेत.(किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते)

-------------------

उद्योगसमूहांनी मदत करावीप्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी निवडणुकी बरोबरच दुष्काळग्रस्त जनतेच्या मदतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे येथील मोठ्या उद्योगसमूहांनी सीएसआरमधून मदत करावी. साखर कारखाने, तसेच शिर्डी, मुंबईतील सिद्धिविनायक यांसारख्या श्रीमंत देवस्थानांनी जनावरांसाठी चारापाणी, पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी. जनतेने देखील लग्नसमारंभातील अनावश्यक खचार्ला फाटा देऊन हा पैसा दुष्काळी भागातील मदतकार्यासाठी वापरावा. सर्वांच्या सहकार्यातूनच दुष्काळग्रस्तांना मोलाची मदत मिळेल.- राजकुमार रंगनाथ पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संशोधन संघ पुणे.>दुष्काळावर मते मिळत नाहीतआजची परिस्थिती बघता एकही राज्यकर्ता हा दुष्काळी उपाययोजना आणि भविष्यातील कार्य. याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. कारण या 'स्टार प्रचारक ' सरकारला माहीत आहे की, ‘दुष्काळ’ या विषयावर मते मिळत नाहीत. तो मतपेटीचा विषय नाही, अशी त्यांची पक्की धारणा झाली आहे. त्याचा परिणाम आज गावेच्या गावे जनावरांच्या छावनीमध्ये स्थलांतरित झाल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. तरुण मंडळी प्रचाराच्या महान राष्ट्रकार्यात गुंतली आहेत. दुष्काळग्रस्तांना दिलासा देताना आज तरी कोणीच दिसत नाही.- सागर संजय सोनवणे, पवननगर ,सिडको ,नाशिक.>आश्वासनांवर जगायचेलोकसभा निवडणूक आणि दुष्काळ एकत्र आला असताना निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच पक्षातील नेते निवडणूक आणि मिरवणुका यामध्ये व्यस्त आहेत. आपण किती मोठे जनसेवक आहोत, याचा अभास निर्माण केला जात आहे. राज्यातील २५ हजारांहून अधिक गावात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी जनता आश्वासनावर जगत आहे. मात्र मुक्या जनावरांनी काय करावे, हा प्रश्न आहे.- सोमिनाथ दगडघाटे,जाधववाडी, औरंगाबाद.>कुठे गेली जलयुक्त शिवार योजना?राज्यात सध्या २५ हजारांहून अधिक गावे दुष्काळात होरपळत आहेत. त्यांना पाणी मिळत नाही. जनावरांना चारा मिळत नाही. याबाबत कोणीतरी बोलेल असे वाटते, पण सत्ताधारी असो वा विरोधक दोघे सध्या निवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. एकमेकांवर वैयक्तिक आरोपांबरोबरच जातीधर्माचा ऊहापोह केला जात आहे, पण दुष्काळाबाबत कोणीच बोलताना दिसत नाही. जलयुक्त शिवार योजनेचा मोठा गवगवा झाला. त्यामुळे पाणी पातळी वाढेल असे वाटले होते, पण त्यात पाण्याऐवजी पैसाच जिरला अन् ठेकेदारांचे कल्याण झाले, अशीच सध्याची परिस्थिती आहे.- पद्माकर उखळीकर, परभणी.>पाणीसाठ्याचे नियोजन गरजेचेराज्यातील सर्वच धरणातील पाणीसाठी कमी झाला असून उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. अजून किमान दोन महिने तरी उपलब्ध पाणी पुरवावे लागणार आहे. पाण्याची नासाडी, पाइपलाइनची गळती याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, गरजूंना पाणी मिळते की नाही, जनावरांच्या छावण्यात चारा, पाणी पुरेसे दिले जाते की नाही, याकडे लक्ष देण्याची गरज असताना यंत्रणा मात्र निवडणुकीत मग्न आहे. सगळ्यांनाच दुष्काळापेक्षा निवडणूक महत्त्वाची वाटते आहे.- जगन्नाथ हरिश्चंद्र पाष्टे, गुलमोहर कॉलनी सिडको औरंगाबाद>कोण म्हणतंय दुष्काळ आहे?हजारो-लाखो जनसमुदायाच्या जंगी सभा होत आहेत. अपार गदीर्चे रोड शो होत आहेत. करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रचंड झगमागटाच्या रॅली निघत आहेत, हॉटेल-ढाबे फुल्ल होऊन कार्यकर्ते मजेत तर्र आहेत. न्यूज चॅनेलवर रात्रंदिवस अखंड निवडणुकीचाच रतीब सुरू आहे. गल्लोगल्ली कोण निवडून येणार याचीच अविरत चर्चा सुरू आहे. चहुबाजूला दिवसरात्र हे सर्व सुरू असतांना यातून पाच सेकंद मोकळ्या मिळालेल्या मेंदूला प्रश्न पडतो, खरंच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे?- मेघा मोरे-म्हस्के, नवयुग कॉलनी, भावसिंग पुरा, औरंगाबाद.> दुष्काळ नजरेआडनिवडणुकीच्या धामधुमीत राज्यात पडलेला भीषण दुष्काळ दुर्लक्षिला जात आहे. लोकांना पाणी, जनावरांना चारा मिळतो की नाही, हे पाहायला सध्या कोणालाच सवड नाही. किंबहुना, आचारसंहिता आड येत असल्याने दुष्काळ नजरेआड केला जात आहे.- डॉ. पद्माकर गुल्हाणे,बोरलेनगर, यवतमाळ.

टॅग्स :droughtदुष्काळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019