शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोठडी बघितली की तब्येत कशी बिघडते, दिपक केसरकर यांचा नितेश राणेंना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 21:37 IST

Dipak Kesarkar : तपासणी योग्य करा अन्यथा उत्तरे द्यावी लागतील

सावंतवाडी : तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करून कोण रूग्णालयात दाखल झाले असेल. तर त्याची उत्तरे अधिकाऱ्यांना द्यावी लागतील आरोपीने कोठडी बघितल्यावर त्याची तब्येत बिघडते कशी? याची खात्री प्रशासनाने करणे गरजेचे होते. मी गृहराज्यमंत्री असताना असे प्रकार घडत असत त्यावेळी अधिकाऱ्यांना खात्री करण्याचे निर्देश देत होतो, आता असे कोणीतरी केले पाहिजे असा सल्ला माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी सरकारला दिला आहे.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बबन राणे, गुणाजी गावडे, अभिजीत मेस्त्री आदि उपस्थित होते. केसरकर म्हणाले,काहीजण सरकार राणे यांना मुद्दामहून अडकवतात असे सांगतात. पण त्याना जर सरकारला अडकवायचेच होते तर सर्वोच्च न्यायालयाने ही त्यांना दिलासा का दिला नाही असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सरकारवर टिका करणे योग्य नसल्याचे ही केसरकर यावेळी म्हणाले.

मी मंत्री असताना  एका प्रकरणात आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी झाली होती.  त्यावेळी त्यांनी तब्येतीचे कारण देऊन रूग्णालयाचा आधार घेतला होता. पण मी तज्ञ डॉक्टरांना तिथे पाठवले, त्यांनी तपासणी केली त्यावेळी त्याच्या तब्येतीला काही झाले नाही म्हणून पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते.याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली.

कोणीतरी असे काम ठामपणे करू शकेलं का? असा सवाल केसरकर यांनी केला. आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला असता तर राणेंना जामीन मिळालाच नसता. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेली टीका योग्य नाही. आतातरी राणेंनी चांगले वागावे नाही तर त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागेल, असाही टोलाही केसरकर यांनी लगावला. माझं कोण व्यक्तीगत दुश्मन नाही, पण सर्वानी चांगल वागले पाहिजे जिल्हा शांत राहिल पाहिजे तर या ठिकाणी  समृद्धी येईल पर्यटन वाढेल मागील पाच वर्षांत कोणाचे डोकेवर काढण्याची हिम्मत झाली नव्हती. जास्ती जास्त पर्यटक जिल्ह्यात येत होते. पण पुन्हा दहशतीचे वातावरण झाल्यास पर्यटक कोण येणार नाही असे मत ही केसरकर यांनी यावेळी मांडले.

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरNitesh Raneनीतेश राणे Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग