शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

कारशेड वळविण्याच्या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प ठरेल अव्यवहार्य; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:10 AM

Devendra Fadanvis, Uddhav Thackeray News: महाविकास आघाडीने मुंबईकरांचा विश्वासघात केला

मुंबई : आरेमेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचे आर्थिक गणित कोलमडणार असून प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता संपेल. शिवाय, प्रकल्पाचा खर्च वाढून अखेर त्याची वसुली मुंबईकरांकडून वाढीव तिकीटदराच्या माध्यमातून केली जाईल. महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या समितीने आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक असल्याचा निष्कर्ष काढला होता, असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली.

कारशेड कांजूरला हलविण्याच्या निर्णयामुळे चार-पाच वर्षे कारडेपोच नसेल. त्यामुळे प्रकल्पाचे काम असून नसल्यासारखे असेल, असे फडणवीस यांनी आज टिष्ट्वटरवरून म्हटले. कारशेडची जागा बदलून सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला. प्रकल्पाला आणखी विलंब करण्यामुळे कार्बनचे उत्सर्जन वाढून पर्यावरणाची अधिक हानी होईल. त्यामुळे वृक्षतोडीच्या परिणामांपेक्षा आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक आहे, असा निष्कर्ष खुद्द महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या समितीनेच काढला. २०१५ साली कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता. या जागेवरून न्यायालयात दावे सुरू असल्याने विचार सोडावा लागला, असे सांगत यासंदर्भातील कागदपत्रेच फडणवीस यांनी उघड केली.पर्यावरणवादी समर्थन करणार का?कांजूरमार्गच्या जागेवरही पर्यावरणाची हानी, जैवविविधेला धोका आणि जनतेची प्रचंड गैरसोय असे अनेक प्रश्न निर्माण होतील. आरे कारशेडची जागा कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित केली होती. आता पर्यावरणवादी मंडळी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का, असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Metroमेट्रोAarey ColoneyआरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे