शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 19:31 IST

Priyanka Gandhi Shares Video: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी रत्नागिरीतील एक व्हिडीओ शेअर करत महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. 

Priyanka Gandhi on Mahayuti: हरियाणा, जम्मू काश्मीरनंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करत महायुती सरकारच्या काळात झालेल्या कामांच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकारने विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. 

रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि नुतनीकरण करण्यात आले. मात्र, लोकार्पणाआधीच छताचा भाग कोसळला. या घटनेचा व्हिडीओ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शेअर करत महायुती सरकारवर टीका केली. 

प्रियंका गांधी महायुती सरकारबद्दल काय म्हणाल्या?

व्हिडीओ शेअर करत प्रियंका गांधी म्हणाल्या, "महाराष्ट्रातील रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे छत उद्घाटन होण्यापूर्वीच कोसळले आहे. तिकडे मुंबई-नाशिक महामार्ग जो पूर्णही झाला नाही, त्यावर ५०० पेक्षा जास्त खड्डे आणि भेंगा पडल्या आहेत."

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवरही भाष्य

"यापूर्वीही सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्घाटन झाल्यानंतर काही महिन्यातच पडला. मुंबईत १८ हजार कोटी रुपये खर्चून बनलेला अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे गेले आहेत", असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

"महाराष्ट्रातील 'खोके आणि धोके' सरकारने जनतेला विकासाच्या नावावर धोका दिला देऊन भरमसाठ भ्रष्टाचार केला आहे. महाराष्ट्रातील जनता लवकरच याचा हिशोब करणार आहे", असे प्रियंका गांधी म्हणाल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसMahayutiमहायुती