शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

coronavirus: कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती, संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 10:51 IST

coronavirus in India: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यामुळे चिंतेत भर पडत आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत आहे. (coronavirus in India) वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यामुळे चिंतेत भर पडत आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत केंद्र सरकारने याविषयावर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. (war-torn situation in the country due to Coronavirus, Sanjay Raut demand the A Spl session of the Parliament)

संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली. त्यात ते म्हणाले की, वाढत्या कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात युद्धजन्य परिस्थितीसारखे वातावरण आहे. युद्धातील बॉम्बहल्ल्यात जशी माणसं मरतात तशी माणसं मरत आहेत. कोरोनाची आकडेवारील लपवण्याचे प्रकार बंद झाले आहेत. चिता जळताना दिसत आहेत. रुग्णसंख्या अजून वाढली तर देशात अराजक निर्माण होईल. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेचं दोन दिवसांच विशेष अधिवेशन बोलवावं. यामध्ये आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळून सहभागी होऊ. या अधिवेशात खासदारांना आपापल्या राज्यामधील समस्या मांडता येतील, असे राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबईत रेमडेसिविरवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही संजय राऊत यांनी आपले मत मांडले. या प्रकरणात विरोधकांची काय मजबुरी आहे कळत नाही. रेमडेसिविरची साठेबाजी नफेखोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून कारवाई होत होती. मात्र विरोधकांना नफेखोरांच्या मागे का उभे राहावे लागतेय, त्यामागची मजबुरी कळत नाही आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

या प्रकरणात लपवाछपवी सुरू होती. राजकारण सुरू होते. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या प्रतिक्रियांमधून तसे संकेत मिळत आहेत. आता या प्रकरणात चौकशी करण्याचे संकेत जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे संकेत दिले आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण