शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Coronavirus: “आजारी बायको जमिनीवर लोळत होती पण बेड मिळाला नाही”; भाजपा आमदार हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 14:41 IST

आमदाराच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये ७ मे रोजी उपचारासाठी दाखल केले.

ठळक मुद्देपत्नीला जवळपास ३ तास जमिनीवरच झोपवावं लागलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बेड उपलब्ध झाला. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये बायकोवर चांगल्यापद्धतीने उपचार होत नाहीत. माझ्या बायकोच्या तब्येतीबाबत कोणीही काही सांगत नाही. तिला जेवण मिळत नाही, पाणी नाही

फिरोजाबाद – यूपीच्या फिरोजाबाद जनपद येथील आमदार रामगोपाल उर्फ पप्पू लोधी हे ३० एप्रिल रोजी कोरोना संक्रमित झाले होते. त्यांच्यासोबत पत्नी संध्या लोधी यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. सुरुवातीला यांना फिरोजाबाद येथील आयसोलेशन वार्डात दाखल केले होते. आमदार रामगोपाळ उर्फ पप्पू लोधी यांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांना शनिवारी आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज मिळाला.

परंतु आमदाराच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये ७ मे रोजी उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी पप्पू लोधी यांच्या म्हणण्यानुसार पत्नीला जवळपास ३ तास जमिनीवरच झोपवावं लागलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बेड उपलब्ध झाला. आता आमदाराच्या पत्नीची अवस्था कशी आहे हे डॉक्टरांनी सांगितले नाही.

भाजपा आमदाराने सांगितले की, एसएन मेडिकल कॉलेजमध्ये बायकोवर चांगल्यापद्धतीने उपचार होत नाहीत. जर आमदाराच्या बायकोला जमिनीवर झोपावं लागलं असेल तिला उपचार वेळेत मिळत नसतील तर सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या बायकोच्या तब्येतीबाबत कोणीही काही सांगत नाही. तिला जेवण मिळत नाही, पाणी नाही अधिकारी आणि डॉक्टरही काय बोलत नाही असा आरोप त्यांनी केला.

दिल्ली, महाराष्ट्र यासारख्या राज्याप्रमाणे उत्तर प्रदेश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. सर्वाधिक लखनौ, कानपूर अशा मोठ्या शहरांची अवस्था बिकट झाली आहे. मागील २४ तासांत यूपीत २६ हजार ८४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. लखनौमध्ये सर्वाधिक २ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण आढळले. सध्या यूपीत एकूण सक्रीय रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार ७३६ इतकी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या गेल्या २४ तासांत २९८ इतकी नोंदवण्यात आली आहे.

आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराकडून योगी सरकारचे वाभाडे

लोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्यांचे जीव वाचवण्याची इच्छा असूनही आम्ही काहीच करू शकत नाही, अशा भावना भाजपा आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्रातून व्यक्त केल्या आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत आणि मदत करायची असूनही आम्हाला मदत करता येत नाही, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे. कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाचा कहर थांबत नाहीए. आम्ही असहायपणे आपल्या माणसांना मरताना बघत आहोत. कोरोनाच्या संकटापासून एकही गाव वाचलेलं नाही, असं सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. लखीमपूरमध्ये ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कित्येकांचा जीव जातोय. तहसील स्तरावर सामुदायिक आरोग्य केंद्रावर ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, असं आमदारांनी पत्रात पुढे नमूद केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ