शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

CoronaVirus News : "लोक ऑक्सिजनसाठी रडताहेत पण आमदार असून मी मदत करू शकत नाही"; भाजपा नेत्यांकडून योगींच्या दाव्यांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 14:05 IST

CoronaVirus Yogi Adityanath Government And BJP : राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु, प्रशासनाच्या योग्य प्रयत्नांअभावी सर्व वाया जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशभाजपामध्ये सर्व काही ठीक नसल्याचंच यातून समोर येतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे. 

लखीमपूर खीरीच्या गोला मतदारसंघाचे भाजपा आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहिलं होतं. आपल्या 24 हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचं गिरी यांनी या पत्रात उल्लेख केला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो लोक मरत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या मतदारसंघात बेड आणि आरोग्य व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. 'लोक ऑक्सिजनसाठी रडत आहेत आणि आमदार असूनही त्यांची मी मदत करू शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत राहिलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही' अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या योग्य प्रयत्नांअभावी सर्व वाया जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कायदेमंत्री बृजेश पाठक हे राज्य सरकारला पत्र लिहिणारे पहिले निर्वाचित सदस्य होते. त्यांनी आपल्या पत्रात लखनऊ प्रशासनाच्या कारभारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. बेड, ऑक्सिजन आणि योग्य उपचार न मिळाल्यानं लोकांना जीव गमवावा लागत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. तसेच मोहनलालगंजचे भाजपा खासदार कौशल किशोर यांनीही अनेकदा परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचं सांगत त्यांनी सरकारी रुग्णालयांत स्वत: लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. 

"उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत ड्युटीवर असणाऱ्या 700 हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू"

कौशल किशोर यांनी निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु, त्याचा परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत ड्युटीवर असणाऱ्या 700 हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनीही मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल पत्रं लिहून कळवलं होतं. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याने रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी नकार देत आहेत आणि रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. आठवड्याच्या सुरुवातीला औराई, भदोहीचे भाजपा आमदार दीनानाथ भास्कर यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. भदोहीच्या भाजपा जिल्हा सचिवांची कोरोना संबंधीत मृत्यूच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाDeathमृत्यू