शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

कोरोनाची लस नेत्यांना प्राधान्याने मिळावी; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 3:24 AM

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजतागायत त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची विम्याची सुरक्षा नसताना आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत.

ठाणे : कोरोना महामारीचे संकट आल्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्वच स्तरांतून अथक परिश्रम करण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनीही आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची अहोरात्र सेवा केली असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना लोकप्रतिनिधींचादेखील अग्रकमाने समावेश करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजतागायत त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची विम्याची सुरक्षा नसताना आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. ठाण्याचे नगरसेवक मुकुंद केणी, विलास कांबळे, कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दशरथ घाडीगावकर, मीरा-भाईंदरचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक दत्ता साने यासह मुंबई, वसई-विरार या परिसरात कोरोनायोद्धे म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोकप्रतिनिधी कोविडबाधित झाले. त्यातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा जनतेची सेवा करीत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करणे, आरोग्य यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्ण्वाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णांना ॲडमिट करणे, कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, सतत पालिका आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे, आजाराबाबत जनजागृती करणे, वेळप्रसंगी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना भेटून दिलासा देणे, आवश्यक मदत देणे अशा असंख्य कामांमध्ये नगरसेवकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे लस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना लोकप्रतिनिधींचाही अग्रक्रमाने समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना