शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine:”...मग सकाळी पत्रकार परिषद गांजा ओढून घेतली होती का?”; गोपीचंद पडळकरांचा राजेश टोपेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:09 IST

पुरेशा लसीचा साठा नसल्याने राज्यात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले होते.

ठळक मुद्देसकाळी आरोग्यमंत्री येत्या १ तारखेपासून १८ वर्षावरील लोकांचं लसीकरण करणार असं सांगतात. त्यानंतर ४ वाजता ती करता येणार नाही भाजपाची जिरवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले, पण भाजपाचं काम चांगलं असल्याने त्यांना ते करता आलं नाही. हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचे. विचारसरणी एक नाही

सांगली – देशात तसेच राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेला सुरूवात होणार आहे. परंतु राज्यात लसीकरण मोहिमेवरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळच्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणार असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले त्यानंतर संध्याकाळच्या ४ वाजताच्या पत्रकार परिषदेत लसीकरण १ मे पासून होणार नाही म्हणाले. मग सकाळची जी प्रेस घेतली ती गांजा ओढून घेतली का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे.(BJP MLC Gopichand Padalkar Target Health Minister Rajesh Tope over Corona Vaccination)

पुरेशा लसीचा साठा नसल्याने राज्यात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले होते. त्यावर गोपीचंद पडळकरांनी टीकास्त्र सोडलं आहे. सकाळी आरोग्यमंत्री येत्या १ तारखेपासून १८ वर्षावरील लोकांचं लसीकरण करणार असं सांगतात. त्यानंतर ४ वाजता ती करता येणार नाही असं म्हणतात. हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचे. विचारसरणी एक नाही, कोणताही अजेंडा नसताना एकत्र आले आहेत अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

त्याचसोबत भाजपाची जिरवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले, पण भाजपाचं काम चांगलं असल्याने त्यांना ते करता आलं नाही. म्हणून आता सत्ताधारी महाराष्ट्रातील जनतेची जिरवत आहेत. राजकारण करण्यापेक्षा या सर्वामधून बाहेर येऊन राज्यातील मृत्यूचे दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असंही भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते राजेश टोपे?

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारनं या वयोगटाला मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र सध्याच्या घडीला राज्याकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा नसल्यानं १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू करण्यास आरोग्यमंत्री टोपेंनी असमर्थता दर्शवली. देशात सध्या दोनच लसी उपलब्ध असल्यानं पर्याय उपलब्ध नाहीत. त्यातच लसींची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांकडे असलेला ५० टक्के साठा केंद्र खरेदी करणार आहे. तर उर्वरित ५० टक्के साठा राज्यं सरकार, खासगी कंपन्या, खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. त्यामुळे राज्यं सरकारांवर मर्यादा येत असल्याची माहिती टोपेंनी दिली. राज्यातील कोरोना लसीकरण ६ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे.

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण १ मेपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र इच्छा असतानाही आम्हाला हे लसीकरण सुरू करता येत नसल्याचं टोपेंनी सांगितलं. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रं सुरू केली जातील. ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी १८ ते ४४ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरRajesh Topeराजेश टोपे