शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

महाआघाडीत वादाची ठिणगी, राहुल गांधींवरील टीकेवरून काँग्रेस-आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोप

By बाळकृष्ण परब | Published: November 16, 2020 11:37 AM

Bihar Assembly Election 2020 : आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

ठळक मुद्देतेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावाशिवानंद तिवारी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेतही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिल्यानंतर महाआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. तिवारी यांच्या टीकेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आरजेडीला आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला आहे.शिवानंद तिवारी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे.बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्द्यावरून आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर अनेक आरोप केले होते. बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असा आरोपही तिवारी यांनी केला.  महाआघाडीसाठी काँग्रेस ही  बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती, असेही शिवानंद तिवारी म्हणाले होते.दरम्यान, शिवानंद तिवारी यांच्या टीकेनंतर भाजपाचे नेते गिरिराज सिंह यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. बिहारमधील महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी सांगितले की राहुल गांधी नॉन सिरियस पर्यटक नेते आहेत. शिवानंद तिवारी राहुल गांधी यांना ओबामांपेक्षा अधिक ओळखू लागले आहेत. मग काँग्रेस अजूनही गप्प का? असा चिमटा त्यांनी काढला होता.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल