शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 19:51 IST

Mumbai Congress : मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेना असो किंवा भाजपा त्यांना विरोध करायलाच पाहिजे, असे आवाहन माजी खासदार संजय निरुपम यांनी केले.

ठळक मुद्दे"काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसचा पाया आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला आहे"

मुंबई: आगामी 2022 ची मुंबई महापालिका निवडणूक पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा नारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काल रात्री कांदिवली पश्चिम रघुलीला मॉल येथे झालेल्या उत्तर मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. आगामी पालिका निवडणुकीला सुमारे एक वर्षाचा कलावधी असताना त्यांनी उत्तर मुंबईतून पालिका निवडणुकीचा बिगुल वाजवत रणशिंग फुंकले.

मनपा निवडणुकीत मुंबईतील सर्वच्या सर्व २२७ जागा लढविण्याची सगळ्याचीच इच्छा असून त्यासाठी मी प्रत्येक वॉर्डात पदयात्रा काढणार आहे. माझी मुंबई माझी काँग्रेस अंतर्गत १०० दिवस १०० वॉर्ड हा उपक्रम राबवणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे, माजी खासदार संजय निरुपम यांना या मेळाव्याला खास निमंत्रित केले होते. आत्ता मुंबई काँग्रेसमध्ये कोणतेच गट तट नाहीत आत्ता फक्त मुंबई काँग्रेस हाच एक मोठा गट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे  व उत्तर मुंबईतील काँग्रेसचे सर्व आजी-माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, उत्तर मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की, काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसचा पाया आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला आहे आणि आजच्या या काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याने सर्व पक्षांना चेतावणी देत काँग्रेस पक्ष ही मुंबई महापालिका निवडणूक २२७ जागांवर लढविण्यास सज्ज आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, काँग्रेस पक्षाने व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकरांच्या हितासाठी नेहमीच कोविड काळामध्ये जनतेसाठी सर्वात जास्त काम काँग्रेसने केले. गरीब व मजुरांसाठी सर्वात जास्त मोफत ट्रेन काँग्रेस पक्षाने सोडल्या. आता या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे हेच काम जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन त्यांनी केले.

आज काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. पण काही वेळेस काँग्रेस पक्षाला दुर्लक्षित करण्याचे कारस्थान सुरू आहे. ज्या ज्या वेळेस, ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसने इतर पक्षांसोबत युती केली आहे. त्या त्या वेळेस काँग्रेस पक्षाला दुर्लक्षित करण्यात आलेले आहे. म्हणून सत्तेत जरी असलो तरी आपली स्वतंत्र ओळख काँग्रेसने ठेवायलाच हवी. मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेना असो किंवा भाजपा त्यांना विरोध करायलाच पाहिजे, असे आवाहन माजी खासदार संजय निरुपम यांनी केले. 

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाcongressकाँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारणElectionनिवडणूक